श्रीमाताजी आणि समीपता – १२
साधक : एकमेव श्रीमाताजींमध्ये विलीन होण्याची आणि प्रत्येकाशी असलेले माझे नातेसंबंध तोडण्याची माझी तयारी आहे. सर्व अडथळ्यांवर मात करण्यासाठी मी कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे ते कृपा करून मला सांगाल का? श्रीमाताजींनी मला आंतरिकरित्या आणि बाह्यतः देखील साहाय्य करावे, अशी माझी प्रार्थना आहे.
श्रीअरविंद : तुम्ही अंतरंगातून श्रीमाताजींकडे वळले पाहिजे, केवळ त्यांच्याकडेच वळले पाहिजे, हीच त्यासाठीची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. यासाठी पूरक ठरावे म्हणूनच केवळ बाहेरचे अतिरिक्त संपर्क टाळणे आवश्यक असते. परंतु लोकांबरोबर असलेले सर्वच संपर्क टाळणे हे अभिप्रेत नाही किंवा त्याची आवश्यकही नाही. जर कोणती गोष्ट आवश्यक असेल तर ती हीच की, तुम्ही स्वतःला पूर्णपणे बहिर्मुख न होऊ देता, तुमच्या संपर्कातील व्यक्तींना योग्य आंतरिक चेतनेनिशी भेटले पाहिजे. त्या पृष्ठवर्ती गोष्टी आहेत असे समजून त्यांच्याशी वागले पाहिजे; त्यांच्याशी खूप सलगीने किंवा त्यांच्यामध्येच मिसळून गेल्याप्रमाणे वागता कामा नये.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 459)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…