साधना, योग आणि रूपांतरण – २९५
अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण
बहुधा जुन्या स्मृती या अवचेतनामधून (Subconscient) पृष्ठभागावर येतात. जेव्हा अशा स्मृती जाग्या होतात तेव्हा, त्यांचे विलयन (dissolve) करण्यासाठी व त्या काढून टाकण्यासाठीच पृष्ठभागावर आल्या आहेत हे ओळखून त्यांची (योग्य रीतीने) हाताळणी केली पाहिजे. (अवचेतनाच्या प्रभावामुळे व्यक्ती गतकाळाशी संबद्ध राहात असते. ही कर्माची यंत्रणा असते.) अवचेतनामधून आलेल्या स्मृतींचे सातत्याने विलयन केल्यामुळे, व्यक्ती गतकाळाशी संबद्ध राहणार नाही तर, व्यक्ती जिवाच्या भावी बंधमुक्त प्रवासासाठी मुक्त होईल. तुम्हाला जेव्हा यासंबंधी खरे ज्ञान होते, म्हणजे अमुक एक गोष्ट का घडली, त्याचे काय प्रयोजन होते, याचे जेव्हा तुम्हाला ज्ञान होते तेव्हा त्यासंबंधीच्या स्मृती सहजपणे निघून जातात, आणि हा सर्वोत्तम मार्ग आहे.
– श्रीअरविंद (CWSA 31 : 610)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…