साधना, योग आणि रूपांतरण – २९५
अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण
बहुधा जुन्या स्मृती या अवचेतनामधून (Subconscient) पृष्ठभागावर येतात. जेव्हा अशा स्मृती जाग्या होतात तेव्हा, त्यांचे विलयन (dissolve) करण्यासाठी व त्या काढून टाकण्यासाठीच पृष्ठभागावर आल्या आहेत हे ओळखून त्यांची (योग्य रीतीने) हाताळणी केली पाहिजे. (अवचेतनाच्या प्रभावामुळे व्यक्ती गतकाळाशी संबद्ध राहात असते. ही कर्माची यंत्रणा असते.) अवचेतनामधून आलेल्या स्मृतींचे सातत्याने विलयन केल्यामुळे, व्यक्ती गतकाळाशी संबद्ध राहणार नाही तर, व्यक्ती जिवाच्या भावी बंधमुक्त प्रवासासाठी मुक्त होईल. तुम्हाला जेव्हा यासंबंधी खरे ज्ञान होते, म्हणजे अमुक एक गोष्ट का घडली, त्याचे काय प्रयोजन होते, याचे जेव्हा तुम्हाला ज्ञान होते तेव्हा त्यासंबंधीच्या स्मृती सहजपणे निघून जातात, आणि हा सर्वोत्तम मार्ग आहे.
– श्रीअरविंद (CWSA 31 : 610)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…