साधना, योग आणि रूपांतरण – १३८
जेव्हा तुम्हाला थकल्यासारखे वाटते तेव्हा अतिश्रम करू नका; विश्रांती घ्या. तेव्हा फक्त सामान्य जीवनव्यवहार चालू ठेवा. अस्वस्थपणे, हे नाही तर ते, असे सारखे काहीतरी करत राहणे हा थकवा दूर करण्याचा उपाय नव्हे. जेव्हा शीणल्याची, दमल्याची जाणीव होते तेव्हा अंतरंगामध्ये आणि बाह्यतःसुद्धा अविचल, स्वस्थ (quiet) राहणे गरजेचे असते. (वास्तविक) नेहमीच तुमच्या सभोवार एक प्रकारची शक्ती असते, तिला तुम्ही आवाहन करू शकता आणि ती शक्ती शीण, थकवा यासारख्या गोष्टी पळवून लावू शकते, परंतु ती शक्ती ग्रहण करण्यासाठी, अविचल कसे राहायचे हे तुम्ही शिकले पाहिजे.
*
अतिश्रम करणे चुकीचे असते कारण कालांतराने त्याचे परिणाम दिसून येतात. तुमच्यापाशी जर ऊर्जा असेल तर, ती सर्वच्या सर्व खर्च करता कामा नये. शरीरप्रणालीची कायम स्वरूपाची (permanent) ताकद वाढविण्यासाठी म्हणून त्यातील काही ऊर्जा साठवून ठेवली पाहिजे.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 274)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…