साधना, योग आणि रूपांतरण – १३८
जेव्हा तुम्हाला थकल्यासारखे वाटते तेव्हा अतिश्रम करू नका; विश्रांती घ्या. तेव्हा फक्त सामान्य जीवनव्यवहार चालू ठेवा. अस्वस्थपणे, हे नाही तर ते, असे सारखे काहीतरी करत राहणे हा थकवा दूर करण्याचा उपाय नव्हे. जेव्हा शीणल्याची, दमल्याची जाणीव होते तेव्हा अंतरंगामध्ये आणि बाह्यतःसुद्धा अविचल, स्वस्थ (quiet) राहणे गरजेचे असते. (वास्तविक) नेहमीच तुमच्या सभोवार एक प्रकारची शक्ती असते, तिला तुम्ही आवाहन करू शकता आणि ती शक्ती शीण, थकवा यासारख्या गोष्टी पळवून लावू शकते, परंतु ती शक्ती ग्रहण करण्यासाठी, अविचल कसे राहायचे हे तुम्ही शिकले पाहिजे.
*
अतिश्रम करणे चुकीचे असते कारण कालांतराने त्याचे परिणाम दिसून येतात. तुमच्यापाशी जर ऊर्जा असेल तर, ती सर्वच्या सर्व खर्च करता कामा नये. शरीरप्रणालीची कायम स्वरूपाची (permanent) ताकद वाढविण्यासाठी म्हणून त्यातील काही ऊर्जा साठवून ठेवली पाहिजे.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 274)
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…