साधना, योग आणि रूपांतरण – १३८
जेव्हा तुम्हाला थकल्यासारखे वाटते तेव्हा अतिश्रम करू नका; विश्रांती घ्या. तेव्हा फक्त सामान्य जीवनव्यवहार चालू ठेवा. अस्वस्थपणे, हे नाही तर ते, असे सारखे काहीतरी करत राहणे हा थकवा दूर करण्याचा उपाय नव्हे. जेव्हा शीणल्याची, दमल्याची जाणीव होते तेव्हा अंतरंगामध्ये आणि बाह्यतःसुद्धा अविचल, स्वस्थ (quiet) राहणे गरजेचे असते. (वास्तविक) नेहमीच तुमच्या सभोवार एक प्रकारची शक्ती असते, तिला तुम्ही आवाहन करू शकता आणि ती शक्ती शीण, थकवा यासारख्या गोष्टी पळवून लावू शकते, परंतु ती शक्ती ग्रहण करण्यासाठी, अविचल कसे राहायचे हे तुम्ही शिकले पाहिजे.
*
अतिश्रम करणे चुकीचे असते कारण कालांतराने त्याचे परिणाम दिसून येतात. तुमच्यापाशी जर ऊर्जा असेल तर, ती सर्वच्या सर्व खर्च करता कामा नये. शरीरप्रणालीची कायम स्वरूपाची (permanent) ताकद वाढविण्यासाठी म्हणून त्यातील काही ऊर्जा साठवून ठेवली पाहिजे.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 274)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…