ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

आंतरिक प्रांताविषयीची जागरूकता

साधना, योग आणि रूपांतरण – ८५

(चेतना अंतराभिमुख झाल्यावर साधकाला कोणकोणते अनुभव येतात हे कालच्या भागात आपण समजावून घेतले.)

साधकाने हे समजून घेतले पाहिजे की, हे अनुभव म्हणजे नुसत्या कल्पना नसतात किंवा स्वप्नं नसतात, तर त्या वास्तव घटना असतात. आणि जसे बऱ्याचदा घडते त्याप्रमाणे जरी त्या गोष्टी म्हणजे अगदी, नुसत्या मनोरचना असल्या, जरी त्या अगदी चुकीच्या किंवा दिशाभूल करणाऱ्या किंवा विरोधी प्रकृतीच्या असल्या तरीही त्यांच्यामध्ये रचनांची म्हणून त्यांची स्वतःची अशी एक शक्ती असते. आणि म्हणून त्या रचनांना नकार देण्यापूर्वी किंवा त्या नाहीशा करण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात घेतली गेली पाहिजे.

प्रत्येक अनुभवाच्या मूल्यामध्ये जरी पुष्कळ फरक असला तरीही प्रत्येक आंतरिक अनुभव हा त्याच्या स्वतःच्या पद्धतीने पूर्णपणे खरा असतो, अंतरात्मा आणि आंतरिक स्तरांच्या वास्तविकतेच्या साहाय्याने तो खरा ठरतो. आपण फक्त शरीरानेच जीवन जगत असतो किंवा केवळ बाह्य मन आणि प्राण यांच्या साहाय्यानेच जीवन जगत असतो असा विचार करणे चूक आहे. आपण सदासर्वकाळ चेतनेच्या इतर स्तरांमध्ये राहत असतो, तेथे कृती करत असतो, तेथे इतरांना भेटत असतो आणि त्यांच्यावर क्रिया करत असतो आणि आपण तेथे जे काही करतो, अनुभवतो आणि विचार करतो, तेथे ज्या शक्ती आपण गोळा करतो, तेथे ज्या परिणामांची आपण तयारी करतो त्या सगळ्याचे आपल्याला ज्ञात नसलेले, अगणित परिणाम आपल्या बाह्य जीवनावर होत असतात, त्यांचे मोल अमाप असते. त्यापैकी सर्वच अनुभव (ते सर्व प्रांत ओलांडून आपल्यापर्यंत) येत नाहीत आणि ते जरी येथवर आलेच तर ते जडभौतिकामध्ये येताना वेगळाच रूपाकार धारण करतात. कधीकधी त्यांच्यामध्ये अगदी तंतोतंत साम्य असते परंतु हे अल्पस्वल्प साम्य हा आपल्या बाह्यवर्ती अस्तित्वाचा पाया असतो. आपण या भौतिक, शारीरिक जीवनामध्ये जे काही करतो, जे काही धारण करतो, जे बनतो त्याची तयारी आपल्या अंतरंगामध्ये पडद्यामागे सुरू असते. आणि म्हणूनच जो योग जीवनाचे रूपांतरण हे आपले ध्येय म्हणून डोळ्यासमोर ठेवतो त्या योगामध्ये, या प्रांतांमध्ये काय सुरू असते याविषयी जागरूक होणे, आणि आपली नियती निर्धारित करणाऱ्या, तसेच आपली आंतरिक आणि बाह्य वृद्धी किंवा विनाश निर्धारित करणाऱ्या गुप्त शक्तींची जाणीव होण्यासाठी, त्यांचे ज्ञान होण्यासाठी आणि त्यांच्याशी व्यवहार करण्यासाठी सक्षम होणे, आणि तेथे प्रभुत्व संपादन करणे या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. जे ईश्वराशी सायुज्यता संपादन करू इच्छितात त्यांच्यासाठी देखील या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात, (कारण) त्यांच्याविना रूपांतरण अशक्य असते. (क्रमशः)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 217-218)

Latest posts by श्रीअरविंद (see all)
श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

मुलांचे संगोपन

(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…

15 hours ago

विजयाची खात्री

जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…

2 days ago

सकारात्मक वृत्तीचा परिणाम

  (लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…

3 days ago

स्वप्नांवर विश्वास ठेवा

उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…

4 days ago

उपयुक्ततावादाचा आजार

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…

5 days ago

शिक्षण आणि संस्कृती

व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…

6 days ago