ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

साधना, योग आणि रूपांतरण – ७८

साधक : समाधीमध्ये काही गोष्टी करणे सोपे जात असेल तर समाधी ही पूर्णयोगासाठीसुद्धा एक अतिशय चांगली अवस्था नाही का? काही महिन्यांपूर्वी मी जेव्हा समाधीसंबंधी बोललो होतो तेव्हा तुम्ही असे म्हटल्याचे मला स्मरते की, “समाधीची आवश्यकता नाही तर एका नवीन चेतनेची आवश्यकता आहे.”

श्रीअरविंद : निश्चितच (समाधी ही चांगली अवस्था आहे); समाधीला या योगामध्ये प्रतिबंध करण्यात आलेला नाही. श्रीमाताजी नेहमी समाधी-अवस्थेमध्ये प्रविष्ट होतात ही गोष्ट हा त्याचा पुरेसा पुरावा आहे. मी जेव्हा तुम्हाला तसे म्हणालो होतो तेव्हा ‘’समाधीची कधीच आवश्यकता नाही किंवा ती कधीच उपयुक्त नाही’’, अशा अर्थाचे ते सार्वत्रिक विधान नव्हते तर, ते विधान तुमच्या तेव्हाच्या गरजेला अनुसरून केलेले होते. (विशिष्ट परिस्थितीत, विशिष्ट संदर्भाने, विशिष्ट व्यक्तीला उद्देशून केलेली) विशिष्ट विधाने मनाद्वारे अनन्य आणि त्रिकालाबाधित नियमामध्ये परिवर्तित करू नयेत.

*

समाधी ही वर्ज्य करायला हवी अशी गोष्ट नाही पण ती अधिकाधिक चेतनायुक्त करणे आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 41), (CWSA 30 : 250)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

माणूस चिंताग्रस्त का आहे?

  (माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…

16 hours ago

उच्चतर चेतना : प्रस्तावना

  मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…

2 days ago

मराठी विकिपीडियावरील नोंदी

नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…

3 days ago

आपल्याला काय संपादन करायचे आहे?

  असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम‌’ संपादन…

4 days ago

आपले कार्य काय?

आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…

5 days ago

विचार-कणिका

  स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…

6 days ago