ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

साधना, योग आणि रूपांतरण – ६०

(ध्यानामध्ये प्राप्त झालेली) चांगली अवस्था कायम टिकून राहत नाही ही बऱ्यापैकी सार्वत्रिकपणे आढळणारी घटना आहे. चांगली अवस्था येणे व निघून जाणे अशी दोलायमान स्थिती नेहमीच आढळून येते. जो बदल होऊ घातलेला आहे तो जोपर्यंत स्वतः स्थिर होत नाही, तोपर्यंत अशी ये-जा चालूच राहते. हे दोन कारणांमुळे घडून येते. प्राण आणि शरीर दोघेही आपापल्या जुन्या गतिविधी एकदम सोडून देण्यास आणि नवीन गतिविधींशी जुळवून घेण्यास असमर्थ असतात हे पहिले कारण. आणि वरून (उच्च शक्तीचा) दबाव आला तर प्रकृतीमध्ये कोठेतरी दडून बसायचे आणि संधी मिळताच डोकं पुन्हा वर काढायचे ही जी (जड)द्रव्याची सवय असते, ती सवय हे दुसरे कारण असते.

*

(तुमच्या प्रकृतीमधील) सर्व घटक खुले होईपर्यंत ही दोलायमानता नेहमीच चालू राहते. दोनपैकी कोणत्या तरी एका कारणामुळे हे घडू शकते.

०१) तुमच्या अस्तित्वामधील एखादा लहानसा भाग किंवा एखादी गतिविधी उफाळून पृष्ठभागावर येते, जो भाग (दिव्य शक्तीप्रत) खुला नाहीये आणि त्याच्यामध्ये उच्चतर शक्तीचा प्रभाव निर्माण होण्याची आवश्यकता आहे.

०२) बाह्यवर्ती शक्तीकडून तुमच्यावर एक प्रकारचे सावट टाकण्यात आले आहे आणि ते सावट तुमच्यामध्ये तुमचा जुना अडथळा परत निर्माण करत आहे असे नाही, पण काहीसा तात्पुरता अंधकार किंवा अंधकाराचा वरकरणी आभास निर्माण करत आहे.

अस्वस्थ होऊ नका, परंतु लगचेच अविचल होऊन स्वतःला खुले करण्याचा प्रयत्न करा. पहिली महत्त्वाची गोष्ट अशी की, ती जुनी चिवट अडचण आणि गोंधळ यांना पुन्हा परतून येण्यास मुभा देऊ नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे, भलेही हा अंधकार काही गंभीर व्यत्यय निर्माण करणारा नसला तरीसुद्धा या अंधकाराला दीर्घ काळ टिकून राहण्याची मुभा देऊ नका. अविचल, सातत्यपूर्ण इच्छाशक्ती बाळगली की, अगदी गंभीरातल्या गंभीर अडचणींना तुम्ही अटकाव करू शकता. तुम्ही अविचल आणि स्थिरपणे सातत्याने उन्मुख राहिलात तर कोणत्याही दीर्घ पीडेचे निवारण होईल.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 60)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

माणूस चिंताग्रस्त का आहे?

  (माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…

17 hours ago

उच्चतर चेतना : प्रस्तावना

  मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…

2 days ago

मराठी विकिपीडियावरील नोंदी

नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…

3 days ago

आपल्याला काय संपादन करायचे आहे?

  असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम‌’ संपादन…

4 days ago

आपले कार्य काय?

आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…

5 days ago

विचार-कणिका

  स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…

6 days ago