ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

साधना, योग आणि रूपांतरण – ६०

(ध्यानामध्ये प्राप्त झालेली) चांगली अवस्था कायम टिकून राहत नाही ही बऱ्यापैकी सार्वत्रिकपणे आढळणारी घटना आहे. चांगली अवस्था येणे व निघून जाणे अशी दोलायमान स्थिती नेहमीच आढळून येते. जो बदल होऊ घातलेला आहे तो जोपर्यंत स्वतः स्थिर होत नाही, तोपर्यंत अशी ये-जा चालूच राहते. हे दोन कारणांमुळे घडून येते. प्राण आणि शरीर दोघेही आपापल्या जुन्या गतिविधी एकदम सोडून देण्यास आणि नवीन गतिविधींशी जुळवून घेण्यास असमर्थ असतात हे पहिले कारण. आणि वरून (उच्च शक्तीचा) दबाव आला तर प्रकृतीमध्ये कोठेतरी दडून बसायचे आणि संधी मिळताच डोकं पुन्हा वर काढायचे ही जी (जड)द्रव्याची सवय असते, ती सवय हे दुसरे कारण असते.

*

(तुमच्या प्रकृतीमधील) सर्व घटक खुले होईपर्यंत ही दोलायमानता नेहमीच चालू राहते. दोनपैकी कोणत्या तरी एका कारणामुळे हे घडू शकते.

०१) तुमच्या अस्तित्वामधील एखादा लहानसा भाग किंवा एखादी गतिविधी उफाळून पृष्ठभागावर येते, जो भाग (दिव्य शक्तीप्रत) खुला नाहीये आणि त्याच्यामध्ये उच्चतर शक्तीचा प्रभाव निर्माण होण्याची आवश्यकता आहे.

०२) बाह्यवर्ती शक्तीकडून तुमच्यावर एक प्रकारचे सावट टाकण्यात आले आहे आणि ते सावट तुमच्यामध्ये तुमचा जुना अडथळा परत निर्माण करत आहे असे नाही, पण काहीसा तात्पुरता अंधकार किंवा अंधकाराचा वरकरणी आभास निर्माण करत आहे.

अस्वस्थ होऊ नका, परंतु लगचेच अविचल होऊन स्वतःला खुले करण्याचा प्रयत्न करा. पहिली महत्त्वाची गोष्ट अशी की, ती जुनी चिवट अडचण आणि गोंधळ यांना पुन्हा परतून येण्यास मुभा देऊ नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे, भलेही हा अंधकार काही गंभीर व्यत्यय निर्माण करणारा नसला तरीसुद्धा या अंधकाराला दीर्घ काळ टिकून राहण्याची मुभा देऊ नका. अविचल, सातत्यपूर्ण इच्छाशक्ती बाळगली की, अगदी गंभीरातल्या गंभीर अडचणींना तुम्ही अटकाव करू शकता. तुम्ही अविचल आणि स्थिरपणे सातत्याने उन्मुख राहिलात तर कोणत्याही दीर्घ पीडेचे निवारण होईल.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 60)

Latest posts by श्रीअरविंद (see all)
श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

मुलांचे संगोपन

(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…

14 hours ago

विजयाची खात्री

जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…

2 days ago

सकारात्मक वृत्तीचा परिणाम

  (लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…

3 days ago

स्वप्नांवर विश्वास ठेवा

उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…

4 days ago

उपयुक्ततावादाचा आजार

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…

5 days ago

शिक्षण आणि संस्कृती

व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…

6 days ago