ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

रामायण आणि महाभारत

भारत – एक दर्शन २१

आपल्या महत्त्वाच्या परंपरेचे, इतिहासाचे ज्ञान देणे, हे जुन्या वैदिक शिक्षणाचे एक अंग होते. प्राचीन समीक्षकांनी, उत्तरकालीन साहित्यिक महाकाव्यांपासून महाभारत व रामायण यांचे वेगळेपण लक्षात यावे या हेतूने या दोन महाकाव्यासाठी ‘इतिहास’ हा शब्द योजला होता. इतिहास म्हणजे एक प्राचीन ऐतिहासिक किंवा पौराणिक परंपरा होत; आणि आध्यात्मिक किंवा धार्मिक किंवा नैतिक किंवा एखादा आदर्शवादी अर्थ अभिव्यक्त करणारी कहाणी वा अर्थपूर्ण आख्यायिका म्हणून तिचा सर्जनात्मक उपयोग केला जात असे. आणि अशा प्रकारे लोकमानस घडविण्यासाठी त्यांचा उपयोग होत असे. महाभारत आणि रामायण या साहित्यकृती मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारे इतिहास कथन करणाऱ्या आहेत आणि त्यांचे प्रयोजनदेखील व्यापक आहे.

ज्या कवींनी ही महाकाव्यं लिहिली आणि ज्यांनी या काव्यात्मक लिखाणामध्ये काही भर घातली त्या कवींचा त्या लिखाणामागचा उद्देश, हा एखादी प्राचीन कथा सुंदर वा उदात्त पद्धतीने सांगावी एवढाच नव्हता किंवा एक अतिशय रसगर्भ, अर्थगर्भ अशी रचना करावी असाही नव्हता, या दोन्ही निकषांमध्ये त्यांना उत्तुंग यश मिळालेले असले तरी, तो काही त्यांचा उद्देश नव्हता. तर ती काव्यं त्यांनी आपण जीवनाचे स्थापत्यकार आहोत, शिल्पकार आहोत या भूमिकेतून लिहिली आहेत. आपण राष्ट्रीय विचार, धर्म, नीती आणि संस्कृती यांना अर्थपूर्ण आकार देणारे रचनाकार, सर्जनशील अभिव्याख्याते आहोत या भूमिकेतून त्यांनी ते लिखाण केले होते. या महाकाव्यांमध्ये जीवनाविषयी सखोल विचार आहेत, धर्म व समाज यांविषयी विशाल आणि महत्त्वपूर्ण दृष्टिकोन आहे, या महाकाव्यांमधून काही अंशी तत्त्वज्ञानात्मक संकल्पनांचा प्रवाह खेळविण्यात आलेला आहे, या महाकाव्यांमध्ये बौद्धिक संकल्पनांच्या महान शक्तीच्या आणि जिवंत सादरीकरणाच्या साहाय्याने, भारताची प्राचीन संस्कृतीच जणू मूर्तिमंत करण्यात आली आहे.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 345-346]

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

प्रामाणिकपणा आणि चिकाटी

  (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…

8 hours ago

ईश्वराच्या निवासाचे दरवाजे

  अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…

1 day ago

अप्रामाणिकपणाचा अडथळा

  (एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…

2 days ago

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी…

  पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…

3 days ago

योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय

  तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…

4 days ago

योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल

  तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…

5 days ago