(सप्टेंबर १९०९)
…भारतभरातील जे युवक आज एका मार्गाच्या शोधात आहेत, कार्य करण्यासाठी धडपडू पाहत आहेत, त्यांना या भावावेगावर स्वार होऊ द्या आणि शक्तिसंपादन करण्याची साधने शोधून काढू द्यात. जे उदात्त कार्य आपल्याला सिद्धीस न्यावयाचे आहे ते कार्य केवळ भावावेगाने साध्य होणार नाही, तेथे सामर्थ्याची आवश्यकता आहे. तुमच्या पूर्वजांच्या शिकवणुकीतून प्राप्त होऊ शकेल अशा शक्तीच्या आधारे, ‘असाध्य ते साध्य’ होऊ शकेल. ती ‘शक्ती’ तुमच्या शरीरामध्ये उतरू पाहण्याच्या तयारीत आहे. ती शक्ती म्हणजे साक्षात ‘माता’च होय. तिला शरण जायला शिका. तुम्हाला साधन म्हणून उपयोगात आणून ती दिव्य ‘माता’ ते कार्य इतक्या त्वरेने आणि इतक्या सामर्थ्याने पूर्णत्वाला नेईल की, त्यामुळे जग आश्चर्यचकित होऊन जाईल. या शक्तिविना तुमचे सारे प्रयत्न धुळीस मिळतील. आता जर तुमच्या हृदयांमध्ये मातेच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना झालीच आहे, तुम्हीही तिची सेवा करावयास शिकले आहात आणि तिची उपसना करत आहात, तर आता तुमच्या अंतरंगातील मातेला समर्पित व्हा. कार्यपूर्तीचा अन्य कोणताच मार्ग नाही.
– श्रीअरविंद
(CWSA 09 : 222-223)
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…