साधनेची मुळाक्षरे – १५
तुमच्या बाजूने कोणतेही प्रयत्न नसतानादेखील दिव्य ‘शक्ती’ प्रभावीरित्या कार्य करू शकते, हे खरे आहे. तिच्या कार्यासाठी तिला तुमच्या प्रयत्नांची नव्हे तर, तुमच्या अस्तित्वाने दिलेल्या सहमतीची आवश्यकता असते.
*
‘श्रीमाताजीं’प्रत स्वत:ला उन्मुख ठेवा, त्यांचे नित्य स्मरण ठेवा आणि अन्य सर्व प्रभावांना नकार देत, श्रीमाताजींच्या ‘शक्ती’ला तुमच्यामध्ये कार्य करू द्या – हा या (पूर्ण)योगाचा नियम आहे.
*
‘श्रीमाताजीं’समोर आंतरात्मिकरित्या उन्मुख राहिल्याने, कार्यासाठी वा साधनेसाठी जे काही आवश्यक आहे ते सर्व क्रमश: विकसित होत जाते, महत्त्वाच्या रहस्यांपैकी हे एक रहस्य आहे, साधनेचे ते केंद्रवर्ती रहस्य आहे.
– श्रीअरविंद
(CWSA 31 : 721), (CWSA 29 : 109), (CWSA 32 : 154)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…