एखादी व्यक्ती जोपर्यंत तुमच्या कल्पना आणि तुमच्या मतांशी सहमत होत नाही तसेच तिची कार्यपद्धती तुमच्या कार्यपद्धतीशी मेळ राखणारी नसते, तोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीशी सुसंवाद साधू शकत नाही, त्यातून सर्व त्रास निर्माण होतात.
तुम्ही तुमची चेतना अधिक विशाल केली पाहिजे आणि हे लक्षात घेतले पाहिजे की, प्रत्येक व्यक्तीचे तिचे तिचे स्वतःचे असे काही नियम असतात. सर्वांच्या इच्छा आणि कृती अगदी एकसारख्याच असल्या पाहिजेत, असा अट्टहास करता कामा नये; तर वैयक्तिक इच्छांच्या आनंददायी एकीकरणामधून, सुसंवाद आणि समजुतदारपणाचा आधार शोधणे आवश्यक असते.
*
आपला विरोधक कसा चुकीचा आहे आणि आपण कसे बरोबर आहोत, हे सिद्ध करण्यातील आपला उतावीळपणा हा प्रगतिशील सुसंवाद प्रस्थापित करण्यातील एक महत्त्वाचा अडथळा असतो.
*
मानसिक संकुचितपणा हा मनुष्यमात्रांमध्ये सर्वात जास्त फैलावलेला आजार आहे. त्यांच्या स्वतःच्या जाणिवेमध्ये जे आहे तेवढेच त्यांना समजू शकते आणि त्याखेरीज अन्य काहीही त्यांना सहन होत नाही.
*
जी व्यक्ती केवळ स्वतःचेच मत विचारात घेते ती अधिकाधिक संकुचित होत जाते.
*
प्रत्येकालाच समाधान देऊ शकेल असा प्रत्येक समस्येवर एक उपाय असतो; परंतु हा आदर्श उपाय शोधण्यासाठी, आपले स्वतःचेच अग्रक्रम इतरांवर लादण्याची इच्छा मनाशी बाळगून तसा प्रयत्न करता कामा नये तर, प्रत्येकालाच त्याची आवश्यकता वाटली पाहिजे.
यासाठी तुमची चेतना विशाल करा आणि सर्वांच्या समाधानाची आस बाळगा.
*
तुम्ही प्रश्नाकडे केवळ तुमच्याच बाजूने पाहता, पण तुम्हाला जर तुमची चेतना विशाल करायची असेल तर, सर्वच बाजूंकडे निःपक्षपातीपणे पाहणे कधीही चांगले. त्यानंतर तुम्हाला असे आढळून येईल की, या दृष्टिकोनाचे खूप फायदे आहेत.
– श्रीमाताजी
(CWM 14 : 266-268)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…