मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०९
भावनांनंतर येतात संवेदना. येथे ही लढाई निर्दयी होते आणि समोरचे शत्रू क्रूर असतात. त्यांना तुमच्यातील अगदी लहानातल्या लहान दुर्बलतेचा देखील सुगावा लागू शकतो आणि तुम्ही जेथे संरक्षणविहीन असता तेथे ते शत्रू नेमकेपणाने हल्ला चढवितात. तुम्ही जे विजय मिळविता ते क्षणभंगुर ठरतात आणि पुन्हा पुन्हा त्याच त्याच लढाया तुम्हाला अनिश्चित काळपर्यंत लढत राहाव्या लागतात. तुम्ही ज्यांना पराभूत केले आहे असे तुम्हाला वाटत असते, ते शत्रू पुन्हा पुन्हा उभे ठाकतात आणि तुमच्यावर हल्ला चढवितात. तुमचा स्वभाव दृढनिश्चयी असला पाहिजे; प्रत्येक पराजय, प्रत्येक अस्वीकार, प्रत्येक नकार, प्रत्येक नाउमेद झेलण्याइतकी अथक सहनशीलता तुमच्याकडे असली पाहिजे आणि ऐहिक घटना आणि दैनंदिन अनुभव हे तुमच्या आत्मशोधाच्या नेहमीच विरोधात जाणारे असल्यामुळे, तुम्हाला जरी त्यांचा उबग आला तरी तो शोध चालू ठेवण्यासाठी, तुमचा स्वभाव दृढनिश्चयी असणे आवश्यक असते. (क्रमश:)
– श्रीमाताजी
(CWM 12 : 86)
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…