मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०९
भावनांनंतर येतात संवेदना. येथे ही लढाई निर्दयी होते आणि समोरचे शत्रू क्रूर असतात. त्यांना तुमच्यातील अगदी लहानातल्या लहान दुर्बलतेचा देखील सुगावा लागू शकतो आणि तुम्ही जेथे संरक्षणविहीन असता तेथे ते शत्रू नेमकेपणाने हल्ला चढवितात. तुम्ही जे विजय मिळविता ते क्षणभंगुर ठरतात आणि पुन्हा पुन्हा त्याच त्याच लढाया तुम्हाला अनिश्चित काळपर्यंत लढत राहाव्या लागतात. तुम्ही ज्यांना पराभूत केले आहे असे तुम्हाला वाटत असते, ते शत्रू पुन्हा पुन्हा उभे ठाकतात आणि तुमच्यावर हल्ला चढवितात. तुमचा स्वभाव दृढनिश्चयी असला पाहिजे; प्रत्येक पराजय, प्रत्येक अस्वीकार, प्रत्येक नकार, प्रत्येक नाउमेद झेलण्याइतकी अथक सहनशीलता तुमच्याकडे असली पाहिजे आणि ऐहिक घटना आणि दैनंदिन अनुभव हे तुमच्या आत्मशोधाच्या नेहमीच विरोधात जाणारे असल्यामुळे, तुम्हाला जरी त्यांचा उबग आला तरी तो शोध चालू ठेवण्यासाठी, तुमचा स्वभाव दृढनिश्चयी असणे आवश्यक असते. (क्रमश:)
– श्रीमाताजी
(CWM 12 : 86)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…