मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०६
आणि शेवटी ते लोक, जे उपजतच योद्धे असतात. जीवन जसे आहे तसे ते स्वीकारूच शकत नाहीत; त्यांना त्यांचा अमर्त्यतेचा अधिकार, पूर्ण आणि पार्थिव अमर्त्यतेचा अधिकार त्यांच्या अंतरंगातूनच स्पंदित होताना जाणवत असतो. मृत्यू म्हणजे एका वाईट सवयीखेरीज अन्य काही नाही याचे त्यांना एक प्रकारचे अंतर्बोधात्मक ज्ञान असते; आणि मृत्युवर विजय मिळवायचाच अशा निश्चयानिशीच जणू ते जन्माला आल्यासारखे वाटतात. मात्र या विजयासाठी त्यांना क्रूर आणि सूक्ष्म हल्लेखोरांच्या सैन्याविरुद्ध घनघोर युद्ध करावे लागते आणि हा लढा सतत द्यावा लागतो, अगदी अक्षरशः प्रति क्षणाला हा लढा द्यावा लागतो. ज्याच्याकडे दुर्दम्य वृत्ती आहे त्यानेच हा प्रयत्न करावा. ही लढाई अनेक आघाड्यांवर चालते; एकमेकांमध्ये मिसळलेल्या आणि एकमेकांना पूरक असणाऱ्या अशा अनेक पातळ्यांवर ही लढाई चालू असते. (क्रमश:)
– श्रीमाताजी
(CWM 12 : 84)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…