मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०६
आणि शेवटी ते लोक, जे उपजतच योद्धे असतात. जीवन जसे आहे तसे ते स्वीकारूच शकत नाहीत; त्यांना त्यांचा अमर्त्यतेचा अधिकार, पूर्ण आणि पार्थिव अमर्त्यतेचा अधिकार त्यांच्या अंतरंगातूनच स्पंदित होताना जाणवत असतो. मृत्यू म्हणजे एका वाईट सवयीखेरीज अन्य काही नाही याचे त्यांना एक प्रकारचे अंतर्बोधात्मक ज्ञान असते; आणि मृत्युवर विजय मिळवायचाच अशा निश्चयानिशीच जणू ते जन्माला आल्यासारखे वाटतात. मात्र या विजयासाठी त्यांना क्रूर आणि सूक्ष्म हल्लेखोरांच्या सैन्याविरुद्ध घनघोर युद्ध करावे लागते आणि हा लढा सतत द्यावा लागतो, अगदी अक्षरशः प्रति क्षणाला हा लढा द्यावा लागतो. ज्याच्याकडे दुर्दम्य वृत्ती आहे त्यानेच हा प्रयत्न करावा. ही लढाई अनेक आघाड्यांवर चालते; एकमेकांमध्ये मिसळलेल्या आणि एकमेकांना पूरक असणाऱ्या अशा अनेक पातळ्यांवर ही लढाई चालू असते. (क्रमश:)
– श्रीमाताजी
(CWM 12 : 84)
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…