पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – १६
राजयोग
…प्राणायाम म्हणजे त्याच्या वास्तविक अर्थाने, प्रकृतीमध्ये आणि स्वतःमध्ये असणाऱ्या प्राणिक शक्तीवर प्रभुत्व होय. हा प्राणायाम प्रत्येक राजयोग्याला आवश्यक असतो; पण तो अधिक सोप्या पद्धतीने करता येणे शक्य असते. राजयोग्याला एकच शारीरिक प्रक्रिया करण्याजोगी वाटते, जी उपयुक्त अशी असते, ती म्हणजे ‘नाडीशुद्धी’, श्वासोच्छ्वासाच्या नियमनाने नाडीसंस्थेचे शुद्धीकरण घडविणे. आणि ही शुद्धीकरणाची प्रक्रिया व्यक्ती आडवी पडलेली असताना, बसलेली असताना, वाचत असताना, लिहीत असताना, चालत असताना देखील करू शकते. या प्रक्रियेचे अनेक मोठे लाभ आहेत. मन आणि शरीर स्थिर करण्यासाठी या प्रक्रियेचा खूप चांगला उपयोग होतो; शरीरसंस्थेमध्ये दबा धरुन बसलेल्या प्रत्येक आजाराला पळवून लावण्यासाठी तिचा उपयोग होतो; गतजन्मांमध्ये साठलेल्या योगिक शक्तीला जागृत करण्यासाठी तिचा उपयोग होतो आणि जर का अशा प्रकारची सुप्त शक्ती अस्तित्वातच नसेल तर, कुंडलिनी शक्तीच्या जागृतीमधील शारीरिक अडथळे दूर करण्यासाठी तिचा उपयोग होतो.
परंतु ही प्रक्रियासुद्धा अनिवार्य नाही. कारण राजयोग्याला हे माहीत असते की, मन शांत केल्याने, तो शरीर देखील शांत करू शकतो; आणि त्याला हे ही ज्ञात असते की, मनावर प्रभुत्व मिळविल्याने, तो शरीर व प्राण या दोन्हीवरही नियंत्रण मिळवू शकतो. शरीर हे मनाचे स्वामी नाही, ते निर्माणकर्ताही नाही किंवा मनाचे नियमनकर्ताही नाही; तर मन हे शरीराचे स्वामी आहे, ते शरीराला घडवू शकते, त्याला वळण लावू शकते; हे राजयोगाचे महान रहस्य आहे.
– श्रीअरविंद
(CWSA 01 : 508)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…