ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – १३

हठयोग

 

हठयोगाचे परिणाम हे डोळे दिपविणारे असतात आणि लौकिक किंवा शारीरिक मनाला त्याची सहजी भुरळ पडते. आणि तरीही एवढ्या सगळ्या खटाटोपामधून सरतेशेवटी नक्की काय मिळविले, असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. शारीरिक प्रकृतीचे उद्दिष्ट, केवळ शारीरिक जीवनाचे जतन, त्याचे उच्चतम पूर्णत्व, अगदी शारीरिक जीवनाचा महत्तर उपभोग घेण्याची क्षमता, या साऱ्याच गोष्टी एका विशिष्ट अर्थाने, अस्वाभाविक स्तरावर घडून येतात. हठयोगाची उणीव अशी की, या कष्टकर आणि अवघड प्रक्रियांसाठी प्रचंड वेळ खर्च करावा लागतो आणि खूप शक्तिवेच करावा लागतो. तसेच हठयोगामध्ये माणसांवर सामान्य जीवनापासून इतकी समग्र पराङ्मुखता (Severance) लादली जाते की, मग त्याच्या परिणामांचा या लौकिक जीवनासाठी उपयोग करणे, हे एकतर अव्यवहार्य ठरते किंवा मग ते उपयोजन आत्यंतिक मर्यादित ठरते. हा जो तोटा आहे त्याच्या मोबदल्यात, अन्य जगांमध्ये, अंतरंगामध्ये ज्या अन्य जीवनाची, मानसिक, गतिशील जीवनाची प्राप्ती आपल्याला होते; तीच प्राप्ती आपल्याला राजयोग, तंत्रमार्ग इ. अन्य मार्गांनी, कमी परिश्रमकारक पद्धतींनी आणि तुलनेने कमी कठोर नियमांच्या आधारे होऊ शकते. दुसरे असे की, याचे शारीरिक परिणाम म्हणून प्राप्त होणारी वाढीव प्राणशक्ती, दीर्घकाळ टिकून राहणारे तारुण्य, आरोग्य, दीर्घायुष्य या साऱ्या गोष्टींचा जर वैश्विक कृतींच्या एका सामायिक संचितामध्ये विनिमय केला नाही, त्यांचा सामान्यांच्या जीवनासाठी उपयोग केला नाही आणि जसा एखादा कंजुष मनुष्य सर्व काही स्वतःकडेच राखून ठेवतो त्याप्रमाणे, केवळ स्वतःसाठीच त्याचा वापर केला, तर मग ही प्राप्ती खूपच अल्प स्वरूपाची आहे. हठयोगामुळे मोठे परिणामही साध्य होतात पण त्याची किंमत अवाजवी असते आणि त्याने अतिशय अल्प हेतूच साध्य होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 35)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

माणूस चिंताग्रस्त का आहे?

  (माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…

16 hours ago

उच्चतर चेतना : प्रस्तावना

  मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…

2 days ago

मराठी विकिपीडियावरील नोंदी

नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…

3 days ago

आपल्याला काय संपादन करायचे आहे?

  असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम‌’ संपादन…

4 days ago

आपले कार्य काय?

आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…

5 days ago

विचार-कणिका

  स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…

6 days ago