श्रीमाताजी : ऑरोविलवासीयांनी अन्नासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही, पण त्यांनी त्याबदल्यात काही काम केले पाहिजे किंवा ते ज्याचे उत्पादन करतात ते त्यांनी देऊ केले पाहिजे. उदाहरणार्थ, ज्यांच्याकडे शेती आहे, त्यांनी त्यांच्या शेतातील पीक दिले पाहिजे; ज्यांचे कारखाने आहेत त्यांनी त्यांच्या कारखान्यांमधील उत्पादने दिली पाहिजेत; कोणी अन्नाच्या मोबदल्यात श्रमदान केले पाहिजे.
आणि त्यातूनच बऱ्याच अंशी पैशाची अंतर्गत देवाणघेवाण संपुष्टात येईल. प्रत्येक बाबतीतच आपण अशा गोष्टी शोधून काढल्या पाहिजेत. मूलत: ही अशा जीवनप्रणालीच्या अभ्यासाची व संशोधनाची नगरी असेल की, जी जीवनप्रणाली अधिक साधीसोपी असेल आणि जिच्यामध्ये उच्चतर गुणांचा विकास करण्यासाठी अधिक वेळ उपलब्ध असेल.
ही फक्त एक छोटी सुरुवात आहे….
मला या गोष्टीवर भर द्यावयाचा आहे की, ऑरोविल हा एक प्रयोग असेल. ऑरोविल हे प्रयोग करण्यासाठी; प्रयोग, संशोधन व अभ्यास यांसाठीच आहे.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 263-64)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…