श्रीमाताजी : ऑरोविलवासीयांनी अन्नासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही, पण त्यांनी त्याबदल्यात काही काम केले पाहिजे किंवा ते ज्याचे उत्पादन करतात ते त्यांनी देऊ केले पाहिजे. उदाहरणार्थ, ज्यांच्याकडे शेती आहे, त्यांनी त्यांच्या शेतातील पीक दिले पाहिजे; ज्यांचे कारखाने आहेत त्यांनी त्यांच्या कारखान्यांमधील उत्पादने दिली पाहिजेत; कोणी अन्नाच्या मोबदल्यात श्रमदान केले पाहिजे.
आणि त्यातूनच बऱ्याच अंशी पैशाची अंतर्गत देवाणघेवाण संपुष्टात येईल. प्रत्येक बाबतीतच आपण अशा गोष्टी शोधून काढल्या पाहिजेत. मूलत: ही अशा जीवनप्रणालीच्या अभ्यासाची व संशोधनाची नगरी असेल की, जी जीवनप्रणाली अधिक साधीसोपी असेल आणि जिच्यामध्ये उच्चतर गुणांचा विकास करण्यासाठी अधिक वेळ उपलब्ध असेल.
ही फक्त एक छोटी सुरुवात आहे….
मला या गोष्टीवर भर द्यावयाचा आहे की, ऑरोविल हा एक प्रयोग असेल. ऑरोविल हे प्रयोग करण्यासाठी; प्रयोग, संशोधन व अभ्यास यांसाठीच आहे.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 263-64)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…