श्रीमाताजी : ऑरोविलवासीयांनी अन्नासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही, पण त्यांनी त्याबदल्यात काही काम केले पाहिजे किंवा ते ज्याचे उत्पादन करतात ते त्यांनी देऊ केले पाहिजे. उदाहरणार्थ, ज्यांच्याकडे शेती आहे, त्यांनी त्यांच्या शेतातील पीक दिले पाहिजे; ज्यांचे कारखाने आहेत त्यांनी त्यांच्या कारखान्यांमधील उत्पादने दिली पाहिजेत; कोणी अन्नाच्या मोबदल्यात श्रमदान केले पाहिजे.
आणि त्यातूनच बऱ्याच अंशी पैशाची अंतर्गत देवाणघेवाण संपुष्टात येईल. प्रत्येक बाबतीतच आपण अशा गोष्टी शोधून काढल्या पाहिजेत. मूलत: ही अशा जीवनप्रणालीच्या अभ्यासाची व संशोधनाची नगरी असेल की, जी जीवनप्रणाली अधिक साधीसोपी असेल आणि जिच्यामध्ये उच्चतर गुणांचा विकास करण्यासाठी अधिक वेळ उपलब्ध असेल.
ही फक्त एक छोटी सुरुवात आहे….
मला या गोष्टीवर भर द्यावयाचा आहे की, ऑरोविल हा एक प्रयोग असेल. ऑरोविल हे प्रयोग करण्यासाठी; प्रयोग, संशोधन व अभ्यास यांसाठीच आहे.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 263-64)
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…