ज्यांना कोणाला ऑरोविलमध्ये राहावयाचे आहे आणि कार्य करावयाचे आहे त्यांच्याकडे – पूर्ण शुभसंकल्प असणे आणि सत्य जाणून घेण्याची व त्याला शरणागत होण्याची सातत्यपूर्ण अभीप्सा असणे आवश्यक आहे. कार्यामध्ये अचानक उद्भवणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी लागणारी पुरेशी लवचीकता त्याच्याकडे असणे आवश्यक आहे, तसेच परमसत्याच्या दिशेने वाटचाल होत राहावी यासाठी लागणारी प्रगतीची असीम अशी इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे.
एक मोलाचा सल्ला : दुसऱ्यांच्या दोषांकडे लक्ष देण्यापेक्षा, स्वत:च्या दोषांकडे लक्ष द्या. प्रत्येकजण जर स्वत:च्या आत्म-पूर्णत्वासाठी गांभीर्याने प्रयत्न करेल तर, त्यामागोमाग समष्टीचे पूर्णत्व आपोआपच येईल.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 200)
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…