ज्यांना कोणाला ऑरोविलमध्ये राहावयाचे आहे आणि कार्य करावयाचे आहे त्यांच्याकडे – पूर्ण शुभसंकल्प असणे आणि सत्य जाणून घेण्याची व त्याला शरणागत होण्याची सातत्यपूर्ण अभीप्सा असणे आवश्यक आहे. कार्यामध्ये अचानक उद्भवणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी लागणारी पुरेशी लवचीकता त्याच्याकडे असणे आवश्यक आहे, तसेच परमसत्याच्या दिशेने वाटचाल होत राहावी यासाठी लागणारी प्रगतीची असीम अशी इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे.
एक मोलाचा सल्ला : दुसऱ्यांच्या दोषांकडे लक्ष देण्यापेक्षा, स्वत:च्या दोषांकडे लक्ष द्या. प्रत्येकजण जर स्वत:च्या आत्म-पूर्णत्वासाठी गांभीर्याने प्रयत्न करेल तर, त्यामागोमाग समष्टीचे पूर्णत्व आपोआपच येईल.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 200)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…