परमोच्चाकडून पृथ्वी ज्या कोणत्या महत्तम गोष्टीची अपेक्षा करू शकेल, ते वरदान आम्ही परमश्रेष्ठाकडे मागितलेले आहे ; आम्ही असे परिवर्तन मागितले आहे की, जे प्रत्यक्षात उतरविणे खूप कठीण आहे; ज्याच्या अटी, शर्ती ह्या खूप कष्टप्रद असणार आहेत. परमसत्य आणि त्याच्या शक्तीचे जडामध्ये अवतरण; जडाच्या पातळीवर, जडचेतनेमध्ये, भौतिक विश्वामध्ये अतिमानसाची प्रस्थापना आणि जडतत्त्वाच्या अगदी मूळापर्यंत झालेले संपूर्ण रुपांतरण, ह्यापेक्षा कोणतीही निम्नतर गोष्ट आम्ही मागितलेली नाही. केवळ परमोच्च कृपेद्वारेच हा चमत्कार घडून येऊ शकतो.
ती परमशक्ती अगदी जडचेतनेमध्येदेखील अवतरलेली आहे; पण तिचे आविष्करण होण्यापूर्वी, तिच्या महान कार्याला उघडपणाने सुरुवात होण्यापूर्वी, प्रभावशाली, परमश्रेष्ठाची कृपा असलेली परिस्थिती येथे असावी अशी तिची मागणी आहे; आणि त्याची वाट पाहत, ती जडभौतिकाच्या घनदाट पडद्याआड उभी आहे. या प्रकृतीमध्ये आणि जडभौतिक अस्तित्वामध्ये त्याचे आविष्करण होण्यासाठीची पहिली अट ही आहे की, सत्य हे तुमच्यामध्ये संपूर्णतया आणि काहीही हातचे राखून न ठेवता स्वीकारले गेले पाहिजे.
संपूर्ण समर्पण; केवळ दिव्य प्रभावासाठीच स्व-चे उन्मीलन; सातत्याने व संपूर्णपणे सत्याची निवड आणि असत्याचा त्याग, केवळ ह्याच अटी आहेत. पूर्णतया, कोणताही अंगचोरपणा न करता, कोणतीही कुचराई व ढोंगीपणा न करता; जडभौतिक जाणिवेच्या आणि तिच्या कार्याच्या अगदी खोलवरपर्यंत ह्या अटींचे पालन प्रामाणिकपणे केले पाहिजे.
– श्रीअरविंद
(CWSA 12 : 372-373)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…