परमेशाचे परिपूर्ण पात्र बनणे आणि दिव्य अतिमानव बनणे; हे तुमचे कार्य आहे आणि हे तुमच्या अस्तित्वाचे ध्येय आहे आणि ह्याचसाठी तुम्ही इथे आहात.
या व्यतिरिक्त इतर जे काही तुम्हाला करावे लागेल ते दुसरे तिसरे काही नसून, एकतर तुमची तयारी करून घेणे आहे, किंवा मार्गावरील आनंद आहे, किंवा हेतूपासून स्खलन, ध्येयच्युती आहे.
या मार्गाधारे मिळणारी सत्ता वा शक्तिसामर्थ्य किंवा मार्गावरील आनंद हे तुमचे गंतव्य आणि प्रयोजन नसून, परमेशाचे परिपूर्ण पात्र बनणे आणि दिव्य अतिमानव बनणे; हेच तुमचे गंतव्य आणि प्रयोजन आहे.
तुम्हाला मार्गावरील हा आनंद मिळत आहे, कारण तुम्हाला ज्याचा वेध लागला आहे, तोदेखील या मार्गावर तुमच्या बरोबर आहे. तुम्ही तुमची सर्वोच्च शिखरे सर करावीत, यासाठीच आरोहणाची ही शक्ती तुम्हाला देण्यात आली आहे.
जर तुमचे काही कर्तव्य असेलच तर ते हेच होय; जर तुम्ही असे विचारत असाल की, तुमचे ध्येय काय असावे, तर ते ध्येय हेच असावे. जर तुम्ही सुखाची अभिलाषा बाळगत असाल तर, उपरोक्त गोष्टीपेक्षा अधिक दुसरा कोणताच आनंद नाही; कारण स्वप्नाचा आनंद असो किंवा झोपेचा आनंद असो किंवा स्व-विस्मृतीचा आनंद असो, हे सारे इतर आनंद तोडकेमोडके वा मर्यादित असतात. पण हा तुमच्या संपूर्ण अस्तित्वाचा आनंद आहे.
जर तुम्ही असे विचारत असाल की, माझे अस्तित्व काय, तर ईश्वर हे तुमचे अस्तित्व आहे आणि इतर सर्वकाही ही त्याची केवळ भग्न वा विपर्यस्त रूपे आहेत.
जर तुम्ही सत्य शोधू पाहात असाल, तर ते सत्य हेच होय. तेच तुमच्यासमोर सातत्याने असू द्या आणि सर्व गोष्टींमध्ये तुम्ही त्याच्याशीच एकनिष्ठ राहा.
– श्रीअरविंद
(CWSA 12 : 150)
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…