एखादी चूक घडली आणि त्याची प्रांजळ कबुली गुरुपाशी दिली तर, ती चूक पुन्हा न करण्याचा तुमचा निर्धार हा फक्त तुमचाच राहात नाही कारण जर तुम्ही प्रामाणिक असाल तर, ईश्वरी व्यवस्थाच तुम्हास अनुकूल अशा पद्धतीने कार्यकारी होते.
मी प्रथम पाँडिचेरी येथे श्रीअरविंदांना भेटले तेव्हाचा हा प्रसंग आहे. मी गाढ ध्यानावस्थेत होते, अतिमानसातील गोष्टी मी पाहात होते. त्या गोष्टी जशा असावयास हव्यात तशाच होत्या, पण काही कारणाने त्या आविष्कृत होत नव्हत्या. जे काही मी पाहिले, ते मी श्रीअरविंदांना सांगितले आणि विचारले त्या गोष्टी आविष्कृत होतील का? ते फक्त एवढेच म्हणाले, ‘हो.” आणि त्याक्षणी मला असे दिसले की, अतिमानसाने या पृथ्वीला स्पर्श केला आहे आणि ते प्रत्यक्षीभूत होण्यास प्रारंभ झाला आहे. जे सत्य आहे ते वास्तवात उतरविण्याची ताकद काय असते, ह्याचा पहिला अनुभव मला येथे पाहावयास मिळाला.
तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे येऊन असे म्हणाल की, “मला या मिथ्यत्वापासून सुटका करून घ्यावयाची आहे” आणि जर तुम्हाला ‘हो’ असे उत्तर मिळाले तर, तुमच्यामध्येही ते सत्य प्रत्यक्षात उतरविण्यासाठी तीच शक्ती कार्यकारी होईल.
– श्रीमाताजी
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…