चैत्य अस्तित्वाचा श्रीमाताजींना आलेला पहिला अनुभव त्या त्यांच्या एका निकटवर्ती शिष्याला सांगत आहेत. तो अनुभव असा – मला तो अनुभव इ.स. १९१२ साली आला. पुढील सर्व वाटचालीसाठी आधारभूत असणारा हा पहिला अनुभव आहे. परंतु ह्या अनुभवापर्यंत पोहोचायला मला संपूर्ण एक वर्ष लागले. मी खाता-पिता, उठता-बसता ‘आंतरिक अस्तित्वाशी एकत्व’ हा एकच ध्यास घेतला होता. मला दुसरे तिसरे काही नको होते. मी सतत त्याचाच विचार करत असे, आणि तेव्हाच एक मजेशीर गोष्ट घडली.
ती नववर्षाच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ होती. मी संकल्प केला होता, “येत्या वर्षात हे नक्की घडलेच पाहिजे.” मी आमच्या स्टुडिओमध्ये होते. त्या स्टुडिओतून बाहेर पडल्यावर समोर अंगण होते. मी सहज म्हणून दार उघडून बाहेर आले, समोर पाहते तो मला उल्कापात होताना दिसला. असे म्हणतात की, तारा निखळून पडत असताना, तुम्ही जर मनात कोणतीही इच्छा बाळगलीत तर ती वर्षाच्या आत खरी होते, आणि मी तसेच केले. तो तारा दिसेनासा व्हायच्या आत मी म्हटले, “आंतरिक अस्तित्वाशी एकत्व..”
आणि खरोखरच, डिसेंबर महिन्याच्या आत मी आंतरिक अस्तित्वाशी एकत्व पावू शकले होते. त्या काळी, आंतरिक अस्तित्वाशी एकरूप व्हायचा मी खूप प्रयत्न करत असे. अगदी रस्त्याने चालत असतानासुद्धा तोच ध्यास असे. मी सतत एकाग्र राहण्याचा प्रयत्न करत असे..ते खूप दुःखदायक असे.. खूप त्रास होत असे. जणू काही मी बंद दरवाजापुढे बसलेली असावे असे ते भासायचे…
पण एके दिवशी मात्र, अचानक, दरवाजा उघडला गेला. आणि नंतर, ती अनुभूती काही तासच नव्हे, तर काही दिवस टिकून राहिली होती.. तो चैत्य पुरुष सर्व काही जाणतो, तोच संकल्प करतो, तोच जीवनाचे नियमन करतो…ही जाणीव झाली आणि नंतर ती जाणीव मला कधीच सोडून गेली नाही..
– श्रीमाताजी (Mothers agenda Vo13 : 0ctober 30, 1962)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…