एक जण मानवी एकतेचा प्रचार करण्यासाठी जगप्रवास करीत होता. मीरा जपानमध्ये असताना, तिची त्या व्यक्तीशी टोकियो येथे भेट झाली. “अमुक अमुक झाले तर किती बरे होईल? प्रत्येकजण सुखी होईल, प्रत्येक जण दुसऱ्याला समजून घेऊ शकेल, कोणीही कोणाशी भांडणार नाही.” अशा कल्पनेचा प्रचार करीत तो जगभर हिंडत असे. लोक त्याला त्याचे नाव विचारत, तेव्हा तो सांगत असे, “मी टॉलस्टॉय.”
लोक अचंबित होऊन विचारत, “ओ, तुम्हीच का ते टॉलस्टॉय?” बिचाऱ्या लोकांना माहीत नव्हते की ‘लिओ टॉलस्टॉय’ आता हयात नाहीत. लोकांना वाटत असे, व्वा ! आपण किती भाग्यवान ! आपल्याला खुद्द टॉलस्टॉय भेटले.
मीरेने त्यास विचारले, “पण ही मानवी एकता कशी साध्य करावयाची?”
तो म्हणाला, “ते तर अगदीच सोपे आहे. प्रत्येकजण एकच भाषा बोलेल, प्रत्येक जण एकाच प्रकारचा पोषाख परिधान करेल, प्रत्येक जण सारखेच जीवन जगेल, प्रत्येक जण सारख्याच प्रकारचे जेवण करेल, अगदी सोपे आहे.”
मीरा म्हणाली, “तर मग ही अशी एकता फारच भयंकर असेल.” पण तो ऐकून घेण्याच्या मनःस्थितीतच नव्हता. मीरा मग पुढे काही बोललीच नाही. कारण मीराला काय म्हणायचे होते ते त्याला समजण्याच्या पलीकडचे होते.
वरील तथाकथित मानवी एकतेचे प्रचारक सुविख्यात रशियन साहित्यिक ‘लिओ टॉलस्टॉय’ नव्हते तर तो होता त्यांचा एक मुलगा! आणि मीरा म्हणजे ‘मीरा अल्फासा’ अर्थात श्रीमाताजी.
श्रीमाताजी तेव्हा त्याला जे सांगू इच्छित होत्या ते ‘मानवी एकते’चे श्रीमाताजींच्या मनातील चित्र आज साकारू पाहत आहे ‘ऑरोविल’च्या रूपात!
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…