तुम्ही लहान मुलांच्या डोळ्यांत लक्षपूर्वक पाहा, तेथे तुम्हाला एक प्रकारचा प्रकाश दिसेल – काहीजण त्याचे वर्णन निष्पाप असे करतात – परंतु तो प्रकाश खूप खरा असतो, खूपच सत्य असतो, जो या जगाकडे आश्चर्याने टुकूटुकू पाहत असतो.
ही आश्चर्याची भावना, ही चैत्याची (Psychic) आश्चर्यभावना असते, की जी सत्य पाहू शकते पण तिला या जगाविषयी फारसे काही अवगत नसते, कारण ती त्या पासून खूप खूप दूर असते.
लहान मुलांमध्ये ती आश्चर्यभावना असते; परंतु जसजशी मुले शिकू लागतात, अधिकाधिक बुद्धिमान, अधिकाधिक शिक्षित होतात, तसतशी ही आश्चर्यभावना मागे पडत जाते आणि मग त्यांच्या डोळ्यांमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या गोष्टी म्हणजे विचार, इच्छा-वासना, आवेग, दुष्टपणा अशा साऱ्या गोष्टी दिसू लागतात. तेव्हा मात्र, अत्यंत शुद्ध असणारी ही छोटीशी ज्योत, तेथे असत नाही. अशावेळी तुम्ही निश्चितपणे समजा की, तेथे ‘मना’चा प्रवेश झालेला आहे आणि ‘चैत्य’ हा खूप दूरवर मागे लोटला गेला आहे.
– श्रीअरविंद
(CWM 04 : 26-27)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…