ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

आमचा योगसमन्वय, मानव हा शरीरधारी आत्मा आहे यापेक्षा, तो मनोमय देहाचा आत्मा आहे असे मानतो; त्यामुळे मानव मनाच्या पातळीवरही आपल्या साधनेला आरंभ करू शकतो, असे मानतो; मनोमय कोशातील मानसिक शक्तियुक्त आत्मा हा उच्च आध्यात्मिक शक्ती, उच्च आध्यात्मिक अस्तित्व प्रत्यक्ष आत्मसात करू शकतो आणि अशा रीतीने, आपले अस्तित्व अध्यात्मसंपन्न करू शकतो आणि या उच्च आध्यात्मिक शक्तीचा उपयोग करून आपली सर्व प्रकृती पूर्ण, पूर्णतासंपन्न करू शकतो, असे आमचा योगसमन्वय मानतो.

असा आमचा दृष्टिकोन असल्याने, आत्म्याला उपलब्ध असणाऱ्या मनाच्या शक्तींचा उपयोग करण्यावर आरंभी आमचा भर आहे. आत्म्याच्या कुलूपांना ज्ञान, कर्म, भक्तीची त्रिविध किल्ली लावून ती उघडण्यावर आमचा भर आहे; आमच्या ‘समन्वययोगा’त हठयोगपद्धती उपयोगात आणावी लागत नाही, मात्र तिचा थोडासा उपयोग करण्यास हरकत नाही; राजयोग पद्धती आमच्या समन्वययोगात अनौपचारिक अंग म्हणून येऊ शकते.

आमचा समन्वययोग आम्ही हाती घेण्याची स्फूर्ती आम्हाला झाली ह्याला कारण आहे ते असे कि – मानवी आध्यात्मिक शक्ती, आध्यात्मिक अस्तित्व जास्तीत जास्त विकसित व्हावे आणि या विकसित अस्तित्वाने व शक्तीने आमच्या मानवी जीवनाच्या सर्व प्रांतांत आम्हाला आमची प्रकृती मुक्त व दिव्य करता यावी, आणि हे सर्व कार्य पूर्णत्वास नेण्याचा मार्ग दीर्घ नसावा, अल्पांत अल्प अगदी जवळचा असावा अशी आमची इच्छा होती आणि असा मार्ग म्हणजे ‘समन्वययोग’ हे आमच्या लक्षात आले.

आमच्या समन्वययोगात ‘आत्मसमर्पण’ (surrender) हे तत्त्व आम्ही साधकांपुढे ठेवले आहे. साधकाने या योगात आपले अस्तित्व सर्वथा ईश्वराच्या हाती द्यावयाचे असते. साधकाने आपले सर्व अस्तित्व ईश्वराच्या अस्तित्वाच्या, जाणिवेच्या, शक्तिच्या, आनंदाच्या हाती द्यावयाचे असते. साधकाच्या अंतरात्म्यात, त्याच्या मनोमय अस्तित्वात, ईश्वराला भेटण्याची जेवढी म्हणून स्थाने आहेत, त्या त्या सर्व स्थानी साधकाने ईश्वराची भेट घ्यावयाची असते; त्याच्याशी साहचर्य, ऐक्य प्रस्थापित करावयाचे असते. हे ऐक्य प्रस्थापित झाल्यावर ईश्वर साधकाच्या साधनभूत अस्तित्वाचा प्रत्यक्ष मालक होतो, आपला पडदा दूर करून, उघडपणे मालक होतो आणि आपल्या उपस्थितीने व मार्गदर्शनाने साधकाचे मानवी अस्तित्व पूर्ण करतो, त्याच्या प्रकृतीच्या सर्व शक्ती पूर्णतासंपन्न करून त्याची दिव्य जीवन जगण्याची पूर्ण तयारी करून देतो.

– श्रीअरविंद

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

माणूस चिंताग्रस्त का आहे?

  (माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…

16 hours ago

उच्चतर चेतना : प्रस्तावना

  मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…

2 days ago

मराठी विकिपीडियावरील नोंदी

नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…

3 days ago

आपल्याला काय संपादन करायचे आहे?

  असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम‌’ संपादन…

4 days ago

आपले कार्य काय?

आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…

5 days ago

विचार-कणिका

  स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…

6 days ago