ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

उच्चतर शक्तीचे अवतरण

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

‘शक्तीला प्रवेश करू द्या,’ असे मी जेव्हा तुम्हाला लिहिले तेव्हा त्याचा अर्थ असा होता की, तुम्ही ती शक्ती खेचण्याची आवश्यकता नाही, मात्र तुमच्या संपूर्ण अभीप्सेद्वारे आणि सहमतीद्वारे तुम्ही तिच्या प्रवेशाला हातभार लावला पाहिजे.

*

अतिमानसिक प्रकाश ‘हटातटाने’ खाली आणणे, खाली खेचणे हे निश्चितच चुकीचे आहे. अतिमानस ही बलपूर्वक मिळविण्याची गोष्ट नाही. योग्य वेळ येईल तेव्हा ते स्वतःहून आपोआप उमलून येईल. पण हे घडून येण्यापूर्वी, बरेच काही करावे लागेल आणि ते धीराने, कोणतीही घाईगडबड न करता करावे लागेल.

*

चक्कर येणे, दुर्बलता किंवा अस्वस्थता या गोष्टी असता कामा नयेत. तुमच्यामध्ये अशी लक्षणे आढळत आहेत याचा अर्थ असा की, शरीराकडून आत्मसात केल्या जाणाऱ्या शक्तीपेक्षा, अधिक शक्ती (Force) शरीरामध्ये खेचली जात आहे. अशा वेळी, अडथळा निघून जाईपर्यंत आणि योग्य संतुलन निर्माण होईपर्यंत, तुम्ही विश्रांती घेतली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 480-481)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

केवळ ईश्वरी शक्तीप्रतच खुले व्हावे

(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून...) ‘क्ष’ हा अवाजवी तामसिक, अक्रिय झाला आहे. तो प्रत्येक गोष्टीलाच खुला…

1 day ago

दिव्य शक्तीस आवाहन का?

  आपल्यामधील अहंपुरुष (ego person) हा स्वतःच्या ताकदीने किंवा इच्छाशक्तीने किंवा ज्ञानाने स्वतःचे रूपांतरण करू…

2 days ago

दिव्य शक्तीचे अवतरण कशासाठी?

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) व्यक्तीमध्ये दिव्य शक्तीचे अवतरण हे सहसा, त्या व्यक्तीच्या प्रकृतीवर कार्य करण्यासाठी आणि…

3 days ago

बुद्धीचा अडथळा?, नव्हे, साहाय्य

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) विचारी मनाच्या (thinking mind) माध्यमातून ईश्वरी शक्तीचे ग्रहण करणे शक्य होणार…

4 days ago

ईश्वरी शक्तीचा पक्ष

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) तुम्ही आध्यात्मिक साधनेच्या बाबतीत फक्त स्व-बळावर विसंबून राहायचे ठरविले तर तुम्ही काहीच…

5 days ago

आध्यात्मिक साक्षात्काराचा एक नवीन आयाम

  (मनुष्याने स्वत:ला उच्चतर चेतनेप्रत समर्पित करायचे हा माणसाच्या चिंताग्रस्ततेवरील एक उपाय आहे, असे श्रीमाताजींनी…

6 days ago