ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

केवळ ईश्वरी शक्तीप्रतच खुले व्हावे

(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून…)

‘क्ष’ हा अवाजवी तामसिक, अक्रिय झाला आहे. तो प्रत्येक गोष्टीलाच खुला झाला आहे आणि त्यामुळे त्याच्यातील शक्ती खर्च होत आहे. व्यक्तीने फक्त ईश्वरी शक्तीप्रत अक्रिय (passive) राहिले पाहिजे. (म्हणजे व्यक्तीने ईश्वरी शक्तीच्या तिच्यामध्ये चालू असलेल्या कार्यास कोणताही विरोध करता कामा नये.) परंतु हे करत असताना, आपण (नकळतपणाने बऱ्यावाईट अशा) सर्वच शक्तींच्या दयेवर तर विसंबून राहत नाही ना, याबाबतही तिने दक्ष राहिले पाहिजे.

दुसऱ्या व्यक्तीमध्ये ईश्वर पाहण्याचा प्रयत्न करत असताना जेव्हा ‘क्ष’ अक्रिय होतो तेव्हा, त्या व्यक्तीच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या कोणत्यातरी अन्य (निम्न) शक्तीच्या तो अधीन झाला असण्याची आणि परिणामतः त्याची स्वतःची शक्ती त्या दुसऱ्या व्यक्तीमध्ये खर्ची पडली असण्याची शक्यता आहे. ‘क्ष’ ने असा प्रयत्न करू नये हे अधिक बरे! त्याने वरून येणाऱ्या दिव्य शांतीसाठी व दिव्य सामर्थ्यासाठी तसेच संपूर्ण विशुद्धतेसाठी आस बाळगावी आणि स्वतःला केवळ ईश्वरी शक्तीप्रतच खुले करावे. मग, कोणत्यातरी अमुक एखाद्या व्यक्तीमध्येच नव्हे तर, सर्वत्रच ईश्वराची जाणीव होत आहे, अशा प्रकारचे अनुभव त्याला आपोआप येऊ लागतील.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 492-493)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

दिव्य शक्तीस आवाहन का?

  आपल्यामधील अहंपुरुष (ego person) हा स्वतःच्या ताकदीने किंवा इच्छाशक्तीने किंवा ज्ञानाने स्वतःचे रूपांतरण करू…

1 day ago

दिव्य शक्तीचे अवतरण कशासाठी?

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) व्यक्तीमध्ये दिव्य शक्तीचे अवतरण हे सहसा, त्या व्यक्तीच्या प्रकृतीवर कार्य करण्यासाठी आणि…

2 days ago

बुद्धीचा अडथळा?, नव्हे, साहाय्य

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) विचारी मनाच्या (thinking mind) माध्यमातून ईश्वरी शक्तीचे ग्रहण करणे शक्य होणार…

3 days ago

ईश्वरी शक्तीचा पक्ष

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) तुम्ही आध्यात्मिक साधनेच्या बाबतीत फक्त स्व-बळावर विसंबून राहायचे ठरविले तर तुम्ही काहीच…

4 days ago

आध्यात्मिक साक्षात्काराचा एक नवीन आयाम

  (मनुष्याने स्वत:ला उच्चतर चेतनेप्रत समर्पित करायचे हा माणसाच्या चिंताग्रस्ततेवरील एक उपाय आहे, असे श्रीमाताजींनी…

5 days ago

सर्व अडचणींचे मूळ

(श्रीमाताजींनी माणसाच्या चिंताग्रस्ततेवरील जो उपाय सांगितला तो आपण कालच्या भागात विचारात घेतला. त्या विवेचनाचा हा…

6 days ago