कूए नावाचे एक डॉक्टर होते. ते मानसिक उपचाराने, स्वयंसूचनेने लोकांचे आजार बरे करत असत. अशा रीतीने पुष्कळ लोकांचे आजार त्यांनी बरे केले होते, त्यामुळे डॉक्टर कूए विख्यात झाले होते.
त्यासंबंधी श्रीमाताजींनी एक किस्सा सांगितला होता. त्या सांगतात, माझ्याकडे एक स्त्री येत असे, तिचे केस प्रचंड प्रमाणात गळत असत. आता लवकरच तिला टक्कल पडेल अशी तिची स्थिती झाली होती. त्याच सुमारास कोणीतरी तिला डॉ. कूए यांच्या उपचारप्रणालीची माहिती दिली. तिने तो प्रयोग करायला सुरुवात केली. केस विंचरताना, ती स्वतःच्या मनाशी असा विचार करत असे की, “माझे केस गळणार नाहीत.” पहिल्या एक दोन वेळेला त्याचा काहीच परिणाम झाला नाही पण तिने तो प्रयोग नेटाने चालू ठेवला. प्रत्येक वेळी केस विंचरण्यापूर्वी ती निश्चयपूर्वक “मी माझे केस आता विंचरणार आहे पण ते गळणार नाहीत.” असा विचार करत असे. आणि खरोखरच महिन्याभरात तिचे केस गळणे थांबले. नंतर तिने असा विचार करायला सुरुवात केली की, “आता माझे केस वाढत आहेत.” आणि ती त्यामध्ये कमालीची यशस्वी झाली ; खरोखरच मी तिचे वाढलेले केस पाहिले.
मात्र यातील मेख एवढीच की, अशा प्रकारची विचार-रचना करत असताना, तुमच्या मनाच्या दुसऱ्या भागाने असे म्हणता कामा नये की, “मी तसा विचार करत आहे खरा, पण त्याचा काही उपयोग होईल की नाही कोण जाणे?” तुम्ही जर असा निराशावादी विचार केलात तर अशा विचारांनी तुम्ही तुमचे काम स्वतःच वाया घालविता.
श्रीमाताजी पुढे म्हणतात, लोक चुकीच्या पद्धतीने विचार करण्यात त्यांचा वेळ व्यर्थ घालवतात. त्यांची मानसिक क्रिया ही सर्वसामान्यतः अर्धी निराशावादी आणि अर्धी विघातक असते. त्यांनी जे काही केले आहे त्याचे कसे भयानक त्रासदायक परिणाम घडून येतील आणि कोणकोणत्या वाईट गोष्टी घडू शकतील अशा प्रकारची कल्पना करण्यामध्ये ते त्यांचा बहुतांशी वेळ घालवितात. पण त्याऐवजी त्यांनी त्यांच्या कल्पनाशक्तीचा सकारात्मक उपयोग केला असता तर साहजिकच त्यांना त्याचे चांगले परिणाम अनुभवास आले असते.
तुम्ही जर सचेत अभीप्सेच्या स्थितीमध्ये असाल आणि अगदी प्रामाणिक असाल तर, तुमच्या सभोवताली असणाऱ्या सर्व…
आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये सामर्थ्याला निश्चितच एक महत्त्व असते; पण आध्यात्मिक साक्षात्कार हा केवळ सामर्थ्यामुळेच होऊ शकतो…
व्यक्तीला आलेल्या सर्व आध्यात्मिक अनुभवांचे मोल हे फक्त तिच्या प्रामाणिकपणाच्या प्रमाणावरच अवलंबून असते. काही जण…
व्यक्ती जे जे काही करते त्या सर्व गोष्टी ईश्वरार्पण करणे आणि असे करत असताना त्या…
(मला पूर्णयोगाची साधना करायची आहे त्यासाठी मला संन्यास घ्यावा लागेल का, असा प्रश्न एका…
अर्थातच, श्रीमाताजींनी जे काम नेमून दिलेले असते ते त्यांचे स्वतःचे कार्य असते, तो त्यांच्या…