कूए नावाचे एक डॉक्टर होते. ते मानसिक उपचाराने, स्वयंसूचनेने लोकांचे आजार बरे करत असत. अशा रीतीने पुष्कळ लोकांचे आजार त्यांनी बरे केले होते, त्यामुळे डॉक्टर कूए विख्यात झाले होते.
त्यासंबंधी श्रीमाताजींनी एक किस्सा सांगितला होता. त्या सांगतात, माझ्याकडे एक स्त्री येत असे, तिचे केस प्रचंड प्रमाणात गळत असत. आता लवकरच तिला टक्कल पडेल अशी तिची स्थिती झाली होती. त्याच सुमारास कोणीतरी तिला डॉ. कूए यांच्या उपचारप्रणालीची माहिती दिली. तिने तो प्रयोग करायला सुरुवात केली. केस विंचरताना, ती स्वतःच्या मनाशी असा विचार करत असे की, “माझे केस गळणार नाहीत.” पहिल्या एक दोन वेळेला त्याचा काहीच परिणाम झाला नाही पण तिने तो प्रयोग नेटाने चालू ठेवला. प्रत्येक वेळी केस विंचरण्यापूर्वी ती निश्चयपूर्वक “मी माझे केस आता विंचरणार आहे पण ते गळणार नाहीत.” असा विचार करत असे. आणि खरोखरच महिन्याभरात तिचे केस गळणे थांबले. नंतर तिने असा विचार करायला सुरुवात केली की, “आता माझे केस वाढत आहेत.” आणि ती त्यामध्ये कमालीची यशस्वी झाली ; खरोखरच मी तिचे वाढलेले केस पाहिले.
मात्र यातील मेख एवढीच की, अशा प्रकारची विचार-रचना करत असताना, तुमच्या मनाच्या दुसऱ्या भागाने असे म्हणता कामा नये की, “मी तसा विचार करत आहे खरा, पण त्याचा काही उपयोग होईल की नाही कोण जाणे?” तुम्ही जर असा निराशावादी विचार केलात तर अशा विचारांनी तुम्ही तुमचे काम स्वतःच वाया घालविता.
श्रीमाताजी पुढे म्हणतात, लोक चुकीच्या पद्धतीने विचार करण्यात त्यांचा वेळ व्यर्थ घालवतात. त्यांची मानसिक क्रिया ही सर्वसामान्यतः अर्धी निराशावादी आणि अर्धी विघातक असते. त्यांनी जे काही केले आहे त्याचे कसे भयानक त्रासदायक परिणाम घडून येतील आणि कोणकोणत्या वाईट गोष्टी घडू शकतील अशा प्रकारची कल्पना करण्यामध्ये ते त्यांचा बहुतांशी वेळ घालवितात. पण त्याऐवजी त्यांनी त्यांच्या कल्पनाशक्तीचा सकारात्मक उपयोग केला असता तर साहजिकच त्यांना त्याचे चांगले परिणाम अनुभवास आले असते.
व्यक्ती तरुण असो किंवा वृद्ध असो, तिने जर प्रगती केली नाही तर तिला कंटाळा…
(आपण कालच्या भागात अन्नाव्यतिरिक्त उपलब्ध असणाऱ्या एका ऊर्जास्रोताचा विचार केला. आज आता अविनाशी असणाऱ्या…
(पूर्वार्ध) जोपर्यंत माणसं आणि हे जग आत्ता जसं आहे तसंच राहील तोपर्यंत, ऊर्जा मिळविण्यासाठी…
तारुण्य हे, व्यक्ती किती वयाची आहे यावर अवलंबून नसते, तर ते प्रगती करण्याच्या आणि…
श्रीअरविंद हे भूतकाळाशी किंवा इतिहासाशीदेखील संबंधित नाहीत. श्रीअरविंद म्हणजे प्रत्यक्षात येणारा भविष्यकाळ आहेत. तुम्हाला…
भावी काळ हा तरुणांचा आहे. सद्यस्थितीत, एक नूतन व युवा जग आकाराला येत आहे…