नैराश्यापासून सुटका – ३२
(प्रत्येक व्यक्ती नकळतपणे वातावरणामध्ये स्वत:च्या मनोरचना पाठवत असते. त्या मनोरचनांचे विश्व कसे असते याचे वर्णन कालच्या भागात आपण विचारात घेतले. त्याचा हा उत्तरार्ध…)
आपण स्वतः विचार करत असताना, स्वतःकडे पाहणे आणि (मनोरचना प्रत्यक्षात कशा येतात यासंबंधी) घटना पाहणे, स्वतःला आविष्कृत करू पाहणाऱ्या या छोट्याछोट्या जिवंत आकृत्यांचे वातावरणामध्ये सातत्याने जे प्रक्षेपण चालू असते, त्याबाबत जागरूक होणे ही प्रबुद्धतेची (wisdom) सुरूवात असते. आपण आपल्यामध्येच जे मानसिक वातावरण बाळगत असतो त्यामधून या मनोरचना बाहेर पडत असतात.
एकदा आपण त्यांच्याकडे पाहू शकलो, त्यांचे निरीक्षण करू लागलो की मग आपल्याला त्यांचे वर्गीकरण करता येते. तसे करता आले की मग, आपल्या उच्चतर संकल्पाशी किंवा आपल्या अभीप्सेशी मिळत्याजुळत्या नसणाऱ्या मनोरचनांना आपण बाजूला सारू शकतो आणि आपल्या प्रगतीसाठी व सुरळीत विकसनासाठी आपल्याला ज्या साहाय्यक होतील केवळ अशाच मनोरचनांना आविष्कृत होण्याच्या मार्गावर प्रगत होण्यासाठी आपण मुभा देऊ शकतो.
– श्रीमाताजी (CWM 09 : 387)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…