ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

नैराश्यापासून सुटका – ३१

नैराश्यापासून सुटका – ३१

आपण सदासर्वकाळ मनोमय प्रतिमा, मनोरचना (formation) निर्माण करत असतो. आपल्याही नकळतपणे आपण अशा प्रकारच्या प्रतिमा वातावरणामध्ये पाठवत असतो. मग त्या प्रतिमा, त्या मनोरचना वातावरणात इतस्तत: फिरत राहतात. त्या एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातात, त्या मनोरचनांना त्यांचे सहचर भेटतात, कधीकधी त्या एकत्रित येतात आणि आनंदाने एकत्र राहू लागतात. कधीकधी त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होतात; तर कधी त्यांच्यामध्ये लढायासुद्धा होतात. कारण बऱ्याचदा या मानसिक प्रतिमांमध्ये इच्छेचा एक लहानसा घटक मिसळलेला असतो आणि तो स्वतःला प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मग, प्रत्येकजणच तशा मनोरचना वातावरणात पाठविण्याचा प्रयत्न करत राहतो, जेणेकरून ती मनोरचना कृती करू शकेल आणि मग त्या व्यक्तीला हव्या त्यानुसार गोष्टी घडून येऊ शकतील. पण प्रत्येकजणच अशा रितीने वागत असल्याने त्यातून सर्वसाधारणपणे एक गोंधळ निर्माण होतो.

वातावरणातील या सर्व मनोरचना पाहण्याची दृष्टी आपल्याकडे असेल तर, आपल्याला अगदी आश्चर्यकारक गोष्टी दिसून येतील. युद्धभूमी, मनोलहरी, छोट्या छोट्या मनोमय अस्तित्वांच्या झुंडी जिथे दाटीवाटीने राहत आहेत अशी आश्रयस्थानं, अशा अनेक गोष्टी तिथे तुम्हाला दिसतील. ही मनोमय अस्तित्वं सारखी बाहेर हवेमध्ये फेकली जात असतात आणि ती अस्तित्वं सतत मूर्त रूपात येण्याचा प्रयत्न करत असतात.

या सर्व मनोरचनांमध्ये एक समान प्रवृत्ती आढळून येते आणि ती म्हणजे त्यांना मूर्त रूप धारण करण्याची इच्छा असते, त्यांना शारीरिक रूपामध्ये प्रत्यक्षात येण्याची इच्छा असते आणि या मनोरचना अगणित असल्याने – या सर्व मनोरचना येथे पृथ्वीवर आविष्कृत व्हायच्या असतील तर त्यासाठी येथील जागा अपुरी पडेल इतकी त्यांची संख्या प्रचंड असते – या मनोरचना ढकलाढकली करतात, ढोपरांनी एकमेकांना ढोसतात, त्यांच्याशी सहमत नसलेल्या मनोरचनांना त्या मागे ढकलण्याचा प्रयत्न करतात किंवा कधीकधी तर त्या रचना आपापली सैन्यदलंसुद्धा स्थापन करतात आणि चाल करून येतात. काळ आणि अवकाश या दोन्ही ठिकाणी त्या स्वतःसाठी जागा मिळवू पाहतात. या मनोरचनांची संख्या पाहता त्याच्या तुलनेत येथे उपलब्ध असणारी जागा अगदीच अल्पशी असते आणि म्हणून, व्यक्तिशः हे असे होत राहते.

लोकांना हे काही माहीत नसते आणि तरीही लोकं अशा मनोरचना तयार करत राहतात, बहुधा प्रत्येकजणच अशा रचना तयार करत असतो. आणि ते सातत्याने एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीवर आदळत राहतात, ते कधी आशावादी असतात, ते कधी इच्छावासना बाळगतात, कधी त्यांचा अपेक्षाभंग होतो, तर कधी ते आनंदी असतात, कधी ते हताश होतात, कारण त्यांचे या मनोरचनांवर कोणतेच नियंत्रण नसते किंवा प्रभुत्व नसते. (उत्तरार्ध उद्याच्या भागात…)

– श्रीमाताजी (CWM 09 : 386-387)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

प्रामाणिकपणा आणि चिकाटी

  (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…

11 hours ago

ईश्वराच्या निवासाचे दरवाजे

  अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…

1 day ago

अप्रामाणिकपणाचा अडथळा

  (एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…

2 days ago

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी…

  पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…

3 days ago

योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय

  तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…

4 days ago

योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल

  तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…

5 days ago