साधना, योग आणि रूपांतरण – २०७
श्रीमाताजींवर चित्ताची एकाग्रता आणि त्यांच्याप्रति आत्मार्पण हे चैत्य पुरुष (psychic being) खुले करण्याचे थेट मार्ग आहेत. भक्तीमध्ये वाढ झाली असल्याचे तुम्हाला जे जाणवते, ती चैत्य विकसनाची पहिली खूण आहे.
श्रीमाताजींच्या उपस्थितीची वा त्यांच्या शक्तीची जाणीव होणे किंवा त्या तुम्हाला साहाय्य करत आहेत, समर्थ करत आहेत याचे स्मरण होणे ही पुढची खूण आहे.
सरतेशेवटी, अंतरंगातील आत्मा हा अभीप्सेमध्ये सक्रिय व्हायला सुरुवात होईल. आणि मनाला योग्य विचारांकडे वळण्यासाठी, प्राणाला योग्य गतिप्रवृत्ती व भावभावना यांच्याकडे वळण्यासाठी चैत्य बोधाकडून (psychic perception) मार्गदर्शन मिळू लागेल. ज्या गोष्टी बाजूला सारण्याची आवश्यकता असेल त्या गोष्टी दाखवून दिल्या जातील आणि त्यांना नकारही दिला जाईल आणि अशा प्रकारे व्यक्तीचे समग्र अस्तित्व, त्याच्या सर्व गतीविधींसहित त्या एकमेवाद्वितीय ‘ईश्वरा’कडेच वळविले जाईल.
– श्रीअरविंद (CWSA 30 : 321)
प्रामाणिकपणा, सचोटी, निःस्वार्थीपणा, कार्याप्रति निरपेक्ष समर्पण, उदात्त चारित्र्य आणि सरळमार्गीपणा हा आपल्या पूर्णयोगाचा अपरिहार्य…
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…