साधना, योग आणि रूपांतरण – २०७
श्रीमाताजींवर चित्ताची एकाग्रता आणि त्यांच्याप्रति आत्मार्पण हे चैत्य पुरुष (psychic being) खुले करण्याचे थेट मार्ग आहेत. भक्तीमध्ये वाढ झाली असल्याचे तुम्हाला जे जाणवते, ती चैत्य विकसनाची पहिली खूण आहे.
श्रीमाताजींच्या उपस्थितीची वा त्यांच्या शक्तीची जाणीव होणे किंवा त्या तुम्हाला साहाय्य करत आहेत, समर्थ करत आहेत याचे स्मरण होणे ही पुढची खूण आहे.
सरतेशेवटी, अंतरंगातील आत्मा हा अभीप्सेमध्ये सक्रिय व्हायला सुरुवात होईल. आणि मनाला योग्य विचारांकडे वळण्यासाठी, प्राणाला योग्य गतिप्रवृत्ती व भावभावना यांच्याकडे वळण्यासाठी चैत्य बोधाकडून (psychic perception) मार्गदर्शन मिळू लागेल. ज्या गोष्टी बाजूला सारण्याची आवश्यकता असेल त्या गोष्टी दाखवून दिल्या जातील आणि त्यांना नकारही दिला जाईल आणि अशा प्रकारे व्यक्तीचे समग्र अस्तित्व, त्याच्या सर्व गतीविधींसहित त्या एकमेवाद्वितीय ‘ईश्वरा’कडेच वळविले जाईल.
– श्रीअरविंद (CWSA 30 : 321)
(मनुष्यप्राणी या सृष्टीमधील सर्वात दु:खी जीव असला तरी, त्याच्याकडे असलेल्या एका विशेष क्षमतेमुळे तो…
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…