साधना, योग आणि रूपांतरण – १५४
पूर्णयोगांतर्गत भक्ती
साधक : श्रीअरविंदांनी असे सांगितले आहे की, व्यक्ती मानवी प्रेमाकडून दिव्य प्रेमाकडे वळू शकते.
श्रीमाताजी : जे मानवी प्रेम ‘भक्ती’ म्हणून, ‘ईश्वर’विषयक भक्तीची ‘शक्ती’ म्हणून आविष्कृत होते त्या प्रेमाविषयी श्रीअरविंद सांगत होते. ते म्हणतात, सुरुवातीला ईश्वराबद्दलचे प्रेम हे अगदी मानवी स्तरावरील प्रेम असते, आणि त्यामध्ये मानवी प्रेमाची सर्व गुणवैशिष्ट्यं दिसून येतात. ती गुणवैशिष्ट्यंसुद्धा श्रीअरविंदांनी खूप चांगल्या रीतीने स्पष्ट केली आहेत. (भलेही तुमचे प्रेम सुरुवातीला मानवी स्तरावरील असेल पण जर) तुम्ही चिकाटी बाळगलीत आणि आवश्यक ते प्रयत्न केलेत तर, तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता, त्याच्याशी एकात्म पावून त्यायोगे, मानवी स्तरावरील प्रेमाचे दिव्य प्रेमामध्ये रूपांतर करणे अशक्य मात्र नाही. दोन व्यक्तींमधील प्रेमाचे परिवर्तन ईश्वरी प्रेमामध्ये होऊ शकते, असे श्रीअरविंदांनी म्हटलेले नाही.
कोणा एका व्यक्तीने त्यांना भक्तीसंबंधी, साधकाला ‘ईश्वरा’बद्दल जे प्रेम असते त्याविषयी एकदा काही विचारले होते तेव्हा त्यांनी असे सांगितले होते की, सुरुवातीला तुमचे प्रेम हे पूर्णपणे मानवी स्तरावरील असते. ते तर असेही म्हणाले होते की, कधीकधी तर ते प्रेम अगदी व्यावहारिक देवाणघेवाण या प्रकारचेसुद्धा असते. परंतु तुम्ही जर प्रगती केलीत तर, तुमच्या प्रेमाचे ‘दिव्य’ प्रेमामध्ये, खऱ्या भक्तीमध्ये परिवर्तन होऊ शकते.
– श्रीमाताजी (CWM 06 : 174-175)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…