साधना, योग आणि रूपांतरण – १५४
पूर्णयोगांतर्गत भक्ती
साधक : श्रीअरविंदांनी असे सांगितले आहे की, व्यक्ती मानवी प्रेमाकडून दिव्य प्रेमाकडे वळू शकते.
श्रीमाताजी : जे मानवी प्रेम ‘भक्ती’ म्हणून, ‘ईश्वर’विषयक भक्तीची ‘शक्ती’ म्हणून आविष्कृत होते त्या प्रेमाविषयी श्रीअरविंद सांगत होते. ते म्हणतात, सुरुवातीला ईश्वराबद्दलचे प्रेम हे अगदी मानवी स्तरावरील प्रेम असते, आणि त्यामध्ये मानवी प्रेमाची सर्व गुणवैशिष्ट्यं दिसून येतात. ती गुणवैशिष्ट्यंसुद्धा श्रीअरविंदांनी खूप चांगल्या रीतीने स्पष्ट केली आहेत. (भलेही तुमचे प्रेम सुरुवातीला मानवी स्तरावरील असेल पण जर) तुम्ही चिकाटी बाळगलीत आणि आवश्यक ते प्रयत्न केलेत तर, तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता, त्याच्याशी एकात्म पावून त्यायोगे, मानवी स्तरावरील प्रेमाचे दिव्य प्रेमामध्ये रूपांतर करणे अशक्य मात्र नाही. दोन व्यक्तींमधील प्रेमाचे परिवर्तन ईश्वरी प्रेमामध्ये होऊ शकते, असे श्रीअरविंदांनी म्हटलेले नाही.
कोणा एका व्यक्तीने त्यांना भक्तीसंबंधी, साधकाला ‘ईश्वरा’बद्दल जे प्रेम असते त्याविषयी एकदा काही विचारले होते तेव्हा त्यांनी असे सांगितले होते की, सुरुवातीला तुमचे प्रेम हे पूर्णपणे मानवी स्तरावरील असते. ते तर असेही म्हणाले होते की, कधीकधी तर ते प्रेम अगदी व्यावहारिक देवाणघेवाण या प्रकारचेसुद्धा असते. परंतु तुम्ही जर प्रगती केलीत तर, तुमच्या प्रेमाचे ‘दिव्य’ प्रेमामध्ये, खऱ्या भक्तीमध्ये परिवर्तन होऊ शकते.
– श्रीमाताजी (CWM 06 : 174-175)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…