प्रश्न : बाह्य समत्व आणि आत्म्याचे समत्व यामध्ये काय फरक आहे ?
श्रीमाताजी : आत्म्याचे समत्व ही मनोवैज्ञानिक गोष्ट आहे. सर्व घटना मग त्या चांगल्या असोत की वाईट, दुःखीकष्टी न होता, नाउमेद न होता, उतावीळ आणि अस्वस्थ न होता, सहन करण्याची शक्ती म्हणजे आत्म्याचे समत्व. समत्व असले की, काहीही घडले तरी तुम्ही प्रसन्न, शांत राहता.
दुसरे म्हणजे शरीरातील समत्व. हे मानसिक समत्व नसते, तर ते काहीसे भौतिक, शारीरिक समत्व असते; म्हणजे ती अशी एक शारीरिक संतुलनाची स्थिती असते की, ज्यामुळे व्यक्ती कोणताही त्रास न होता, शक्तींचे ग्रहण करू शकते.
व्यक्तीला जर या मार्गावर प्रगत व्हावयाचे असेल तर या दोन्ही समत्वांची सारखीच आवश्यकता असते. आणि त्याशिवाय इतरही काही गोष्टी असतातच. उदाहरणार्थ, मनाची बैठक. सर्व प्रकारच्या कल्पना, अगदी परस्परविरोधी का असेनात, सर्व बाजूंनी येत राहतात आणि तरीदेखील व्यक्तीला त्याचा काही त्रास होत नाही अशी स्थिती म्हणजे मनाची बैठक. व्यक्ती त्या कल्पना पाहू शकते आणि त्यांना त्यांच्या त्यांच्या योग्य स्थानी ठेवू शकते. ती असते मनाची बैठक.
– श्रीमाताजी
(CWM 05 : 22-23)
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…