ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

Categories: समत्व

बाह्य अस्तित्वातील समतेचा पाया

प्रश्न : कोणत्या गोष्टीला तुम्ही, ‘बाह्य अस्तित्वातील समतेचा पाया’ असे म्हणत आहात?

श्रीमाताजी : उत्तम आरोग्य, सुदृढ आणि संतुलित देह हा ‘बाह्य अस्तित्वातील समतेचा पाया’ असतो; एवढेसे काही झाले की एखादी लहानगी मुलगी जशी घाबरून जाते तशी व्यक्तीची मनोवस्था नसेल; एखादी व्यक्ती जेव्हा व्यवस्थित झोप घेते, व्यवस्थित अन्नसेवन करते… जेव्हा व्यक्ती शांत असते, संतुलित असते, अगदी शांत असते, तेव्हा व्यक्तीचा पाया मजबूत असतो आणि मग अशी व्यक्ती मोठ्या संख्येने शक्तींचा स्वीकार करू शकते.

तुमच्यापैकी कोणी आजवर जर आध्यात्मिक शक्ती प्राप्त केली असेल तर, उदाहरणार्थ दिव्य आनंदाची शक्ती ग्रहण केली असेल तर, त्याच्या हे अनुभवास आले असेल की, त्याचे आरोग्य जर उत्तम नसेल तर तो ते अनुभव साठवून ठेवू शकत नाही, टिकवून ठेवू शकत नाही. तो रडू लागतो, ओरडू लागतो, जे काही त्याला प्राप्त झाले आहे ते खर्च करण्यासाठी तो अगदी उतावीळ होऊन जातो. ते करण्यासाठी त्याला हसावे लागते, बोलावे लागते, त्याला हावभाव, हातवारे करावे लागतात अन्यथा तो ती शक्ती राखू शकत नाही, त्याचा कोंडमारा झाल्यासारखे त्याला वाटते. आणि अशा रीतीने हसत राहिल्यामुळे, रडत राहिल्यामुळे, इकडे तिकडे हिंडत राहिल्यामुळे त्याने जे काही प्राप्त केले असते ते, त्या साऱ्या गोष्टी तो गमावून बसतो.

उत्तम संतुलित स्थितीत राहण्यासाठी, जे प्राप्त होत आहे ते आत्मसात करता येण्यासाठी, व्यक्तीने अगदी शांत, अचंचल आणि स्थिर असले पाहिजे. व्यक्तीचा पाया मजबूत असला पाहिजे, आरोग्य उत्तम असले पाहिजे. पाया अत्यंत मजबूत असणे आवश्यक आहे. ती गोष्ट खूप खूप महत्त्वाची आहे.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 22-23)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

माणूस चिंताग्रस्त का आहे?

  (माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…

17 hours ago

उच्चतर चेतना : प्रस्तावना

  मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…

2 days ago

मराठी विकिपीडियावरील नोंदी

नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…

3 days ago

आपल्याला काय संपादन करायचे आहे?

  असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम‌’ संपादन…

4 days ago

आपले कार्य काय?

आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…

5 days ago

विचार-कणिका

  स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…

6 days ago