ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

महायोगी श्रीअरविंद – ०७

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

आता येथील आश्रमीय जीवन म्हणजे साधकांची साधना, त्यांचे कर्म, आणि त्याहून अधिक म्हणजे श्रीअरविंद आणि श्रीमाताजींची साधना या साऱ्या गोष्टी एका लयीमध्ये सुरू होत्या… अगदी २४ नोव्हेंबर १९३८ च्या दर्शनदिनाच्या पूर्वसंध्येपर्यंत सारे काही सुरळीत चालू होते.

श्री. ए. बी. पुराणी (श्रीअरविंद यांचे निकटवर्ती अनुयायी) यांच्या शब्दांत सांगायचे तर, “दि. २४ च्या पहाटे, २.२० ते २.३० च्या दरम्यान श्रीमाताजींनी बेल वाजवली. मी जिन्यावरून धावतपळत वर जाऊन पोहोचलो तेव्हा मला सांगण्यात आले की, श्रीअरविंदांच्या पायाला अपघात झाला आहे आणि मी डॉक्टरांना बोलवावे. या अपघातामुळे त्यांच्या एकांतवासामध्ये बदल घडून आला आणि आता त्यांची देखभाल करणाऱ्या लोकांशी ते बोलू-भेटू लागले. येथे बारा वर्षांचा एक दीर्घ कालावधी सुरु झाला, ज्यामध्ये आंतरिक व बाह्य परिस्थितीनुसार कमीअधिक फरक करण्यात आला, आणि त्यामुळे त्यांना बाहेरच्या जगाशी सुद्धा थेट भौतिक संपर्क साधणे शक्य झाले.”

झालेल्या अपघातामुळे, २४ नोव्हेंबर आणि २१ फेब्रुवारी १९३९ ला त्यांचे दर्शन होऊ शकले नाही. साधकांच्या विनंतीला मान देत श्रीअरविंदांनी दि. २४ एप्रिल १९३९ ला विशेष दर्शन दिले, श्रीमाताजी १९२० साली जेव्हा पाँडिचेरीला कायमच्या वास्तव्यास आल्या तो हा दिवस होता. तेव्हापासून हा दिवस ‘दर्शनदिन’ म्हणून संबोधण्यात येऊ लागला.

अपघाताचा परिणाम म्हणून आता श्रीअरविंद यांनी साधकांबरोबरचा पत्रव्यवहार थांबविला होता. परंतु त्यांच्या बरोबरच्या संपर्काचे एक नवीनच रूप उदयाला आले. तो संपर्क आता अधिक मर्यादित होता पण तो अधिक निकटचा होता. या अपघातानंतर श्रीअरविंदांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होईपर्यंत सहासात साधकांवर, (त्यामध्ये बहुतांशी डॉक्टर मंडळी होती) श्रीअरविंदांची देखभाल करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या कालावधीमध्ये या साधकांसमवेत श्रीअरविंद यांची अनेकानेक विषयांवर चर्चा होत असे. या चर्चामधूनच श्री. निरोदबरन लिखित ‘Twelve years with Sri Aurobindo’ या पुस्तकाची निर्मिती झाली. बरेचदा चालू जागतिक घडामोडींवर या चर्चा चालत असत. १९३९ मध्ये जेव्हा युरोपामध्ये युद्धाची घोषणा करण्यात आली तेव्हा श्रीअरविंद वर्तमानपत्र, नियतकालिकं आणि रेडिओच्या माध्यमातून युद्धाची खबरबात घेऊ लागले. (क्रमश:)

Latest posts by अभीप्सा मराठी मासिक (see all)
अभीप्सा मराठी मासिक

या संकेतस्थळावरील बहुतांश सर्व मजकूर हा श्रीअरविंद व श्रीमाताजी लिखित आहे, त्याचा मराठी अनुवाद अभीप्सा मासिकाने केला आहे. तसेच या मासिकातर्फेच, आकलनाच्या सोयीसाठी काही ठिकाणी चित्रे, तक्ते, आकृत्या यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Recent Posts

प्रामाणिकपणा आणि चिकाटी

  (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…

13 hours ago

ईश्वराच्या निवासाचे दरवाजे

  अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…

2 days ago

अप्रामाणिकपणाचा अडथळा

  (एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…

3 days ago

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी…

  पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…

4 days ago

योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय

  तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…

5 days ago

योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल

  तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…

6 days ago