‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
श्रीअरविंदांचा देह समाधिस्थ करण्यात आल्यानंतर, दि. ०९ डिसेंबर १९५० रोजी श्रीमाताजींनी पुढील संदेश दिला. हा संदेश श्रीअरविंदांच्या समाधीवर संगमवरामध्ये कोरण्यात आला आहे.
“आमच्या प्रभूचे भौतिक आवरण असणाऱ्या हे देहा, तुझ्याप्रत आमची अनंत कृतज्ञता!! ज्याने आमच्यासाठी इतके काही केले, ज्याने कार्य केले, ज्याने संघर्ष केला, ज्याने दुःखभोग सहन केले, ज्याने आशा बाळगली, ज्याने खूप चिकाटी बाळगली; ज्याने सर्वासाठी संकल्प केला, सर्वासाठी प्रयत्न केले, आमच्यासाठी सारे काही तयार करून दिले, ज्याने आमच्यासाठी सारे काही प्राप्त करून घेतले; त्याच्याप्रत आमची अनंत कृतज्ञता! त्याच्यासमोर आम्ही नतमस्तक होत आहोत आणि अशी प्रार्थना करत आहोत की, आम्हाला त्याचे कधीही विस्मरण होऊ नये; अगदी एक क्षणदेखील आम्ही हे विसरू नये की, आम्ही सारे त्याचे ऋणी आहोत.” (क्रमश:)
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…