‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
(चंद्रनगरला केलेल्या प्रस्थानाची अरविंद घोष यांनी स्वत: सांगितलेली हकिकत…)
पोलिस खात्यातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडून मला अशी माहिती मिळाली की, दुसऱ्या दिवशी माझ्या कार्यालयावर छापा घातला जाणार आहे आणि मला अटक करण्यात येणार आहे; ही माहिती मिळाली तेव्हा मी ‘कर्मयोगिन’च्या कार्यालयात होतो. (नंतर खरोखरच कार्यालयावर छापा घालण्यात आला पण माझ्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्यात आले नव्हते; तत्पूर्वीच पाँडिचेरीला जाण्यासाठी मी चंद्रनगर सोडले होते.) ही घटना घडण्यापूर्वी, मी माझ्या आजूबाजूला यासंबंधी काही तावातावाने चर्चा, शेरेबाजी चाललेली ऐकत होतो तेव्हाच आकस्मिकपणे मला वरून एक आदेश आला; तो आवाज माझ्या परिचयाचा होता, तीन शब्दांमध्ये तो आदेश देण्यात आला होता, “चंद्रनगरला जा.” अवघ्या दहापंधरा मिनिटांमध्ये चंद्रनगरला जाणाऱ्या बोटीत मी बसलो होतो. बागबजार किंवा इतरत्र कुठेही न जाता, मी तडक माझा नातेवाईक बिरेन घोष आणि मणी (सुरेशचंद्र चक्रवर्ती) यांच्यासमवेत चंद्रनगरला जाण्यासाठी बोटीवर चढलो, रामचंद्र मुजुमदार यांनी घाटाकडे जाण्याचा मार्ग दाखविला आणि तेथूनच त्यांनी आम्हाला निरोप दिला.
आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा अजून अंधारच होता; ते लगेचच सकाळी कलकत्त्याला परतले. मी तेथे गुप्तपणे माझ्या साधनेमध्ये निमग्न राहिलो आणि दोन वृत्तपत्रांबरोबर (कर्मयोगिन् आणि धर्म ही दोन साप्ताहिके) असलेला माझा सक्रिय संपर्क त्या क्षणापासून संपुष्टात आला.
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…