‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
अरविंद घोष यांची राजकीय कारकीर्द प्रामुख्याने इ. स. १९०२ ते इ. स. १९१० या कालावधीत सामावलेली आहे. मवाळ सुधारणावाद हा त्याकाळातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा धर्म होता पण त्यापेक्षाही अधिक थेटपणे भिडून, राजकीय चळवळ लोकांमध्ये पुढे नेण्यासाठीची एक संधी बंगालमधील जनक्षोभामुळे त्यांना मिळाली. परंतु तोपर्यंत सुरुवातीचा जवळपास निम्मा कालावधी ते पडद्यामागे राहून, आपल्या सहकाऱ्यांसोबत स्वदेशी चळवळीच्या (भारतातील सिन-फेन चळवळ) प्रारंभाची पूर्वतयारी करण्याचे कार्य करत होते. इ. स. १९०६ मध्ये अरविंद बंगालमध्ये आले आणि काँग्रेसमध्ये नव्याने स्थापन झालेल्या ‘नवा पक्ष’ या एका अधिक प्रगत, पण संख्येने मर्यादित आणि तोपर्यंत फारशा प्रभावशाली नसलेल्या पक्षामध्ये सहभागी झाले. या पक्षाचा राजकीय सिद्धान्त म्हणायचा झाला तर तो काहीसा ‘असहकाराचा सिद्धान्त’ म्हणता येईल; पण प्रत्यक्षात ‘सब्जेक्ट्स कमिटी’च्या गुप्त पडद्याआडून वार्षिक सभेमध्ये झालेल्या काही किरकोळ चकमकी यांपेक्षा तेव्हा त्याला काही निराळे असे रूप नव्हते. आपण आता, महाराष्ट्रातील नेते लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली, अखिल भारतीय पक्ष म्हणून एक निश्चित आणि आव्हानात्मक कार्यक्रम घेऊन, जाहीररित्या लोकांसमोर यायला हवे, आणि तेव्हा प्रभावी असलेल्या, मवाळ राज्यधुरंधरांच्या अल्पतंत्राच्या, हातून काँग्रेस व देश हाती घ्यावा यासाठी अरविंदांनी आपल्या प्रमुखांचे मन राजी केले. मवाळ आणि राष्ट्रवादी (ज्याला विरोधक ‘जहाल मतवादी’ असे म्हणत) यांच्यातील ऐतिहासिक संघर्षाची बीजे प्रथम येथे पेरली गेली होती; त्या संघर्षाने केवळ दोन वर्षात भारतीय राजकारणाचा चेहरामोहराच बदलून गेला. (क्रमश:)
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…