‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
अरविंद घोष यांची राजकीय कारकीर्द प्रामुख्याने इ. स. १९०२ ते इ. स. १९१० या कालावधीत सामावलेली आहे. मवाळ सुधारणावाद हा त्याकाळातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा धर्म होता पण त्यापेक्षाही अधिक थेटपणे भिडून, राजकीय चळवळ लोकांमध्ये पुढे नेण्यासाठीची एक संधी बंगालमधील जनक्षोभामुळे त्यांना मिळाली. परंतु तोपर्यंत सुरुवातीचा जवळपास निम्मा कालावधी ते पडद्यामागे राहून, आपल्या सहकाऱ्यांसोबत स्वदेशी चळवळीच्या (भारतातील सिन-फेन चळवळ) प्रारंभाची पूर्वतयारी करण्याचे कार्य करत होते. इ. स. १९०६ मध्ये अरविंद बंगालमध्ये आले आणि काँग्रेसमध्ये नव्याने स्थापन झालेल्या ‘नवा पक्ष’ या एका अधिक प्रगत, पण संख्येने मर्यादित आणि तोपर्यंत फारशा प्रभावशाली नसलेल्या पक्षामध्ये सहभागी झाले. या पक्षाचा राजकीय सिद्धान्त म्हणायचा झाला तर तो काहीसा ‘असहकाराचा सिद्धान्त’ म्हणता येईल; पण प्रत्यक्षात ‘सब्जेक्ट्स कमिटी’च्या गुप्त पडद्याआडून वार्षिक सभेमध्ये झालेल्या काही किरकोळ चकमकी यांपेक्षा तेव्हा त्याला काही निराळे असे रूप नव्हते. आपण आता, महाराष्ट्रातील नेते लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली, अखिल भारतीय पक्ष म्हणून एक निश्चित आणि आव्हानात्मक कार्यक्रम घेऊन, जाहीररित्या लोकांसमोर यायला हवे, आणि तेव्हा प्रभावी असलेल्या, मवाळ राज्यधुरंधरांच्या अल्पतंत्राच्या, हातून काँग्रेस व देश हाती घ्यावा यासाठी अरविंदांनी आपल्या प्रमुखांचे मन राजी केले. मवाळ आणि राष्ट्रवादी (ज्याला विरोधक ‘जहाल मतवादी’ असे म्हणत) यांच्यातील ऐतिहासिक संघर्षाची बीजे प्रथम येथे पेरली गेली होती; त्या संघर्षाने केवळ दोन वर्षात भारतीय राजकारणाचा चेहरामोहराच बदलून गेला. (क्रमश:)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…