ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

बिपिनचंद्र पाल हे त्याकाळी त्यांच्या ‘न्यू इंडिया’ या साप्ताहिकामधून स्वयंसाहाय्यता आणि असहकार धोरणाचा प्रचार प्रसार करत असत, त्यांनी आता ‘वंदे मातरम्’ नावाचे दैनिक काढले, पण अर्थातच हे साहस अल्पकालीनच ठरणार होते कारण स्वत:च्या खिशातल्या ५०० रू. च्या आधारे त्यांनी हे साहस आरंभले होते आणि भविष्यामध्येही आर्थिक साहाय्य मिळण्याची कोणतीही शाश्वती नव्हती. आपल्या या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे अशी विनंती त्यांनी अरविंद घोष यांना केली आणि त्यांनीही त्याला तात्काळ संमती दिली कारण आपल्या क्रांतिकारक हेतुंचा सार्वजनिकरित्या प्रचार प्रसार करण्यास आरंभ करण्याची हीच संधी आहे असे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी काँग्रेसमधील पुरोगामी विचारसणीच्या युवकांच्या समूहाची एक बैठक बोलाविली आणि त्या सर्वांनी एक नवीन राजकीय पक्ष स्थापन करून, उघडपणे समोर यायचे असे ठरविले. त्यासाठी लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या, महाराष्ट्रातील समानधर्मा गटाबरोबर हातमिळवणी करायची आणि कलकत्ता येथील अधिवेशनामध्ये आधीच नामोहरम झालेल्या मवाळ पक्षाशी दोन हात करायचे असे त्यांनी ठरविले. नव्याने स्थापन झालेल्या या पक्षाचे प्रयोजन आणि कृतिकार्यक्रम यांचा प्रचार करण्यासाठी बिपिनचंद्र पाल गावोगावी जात असत तेव्हा, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये अरविंदांचे मार्गदर्शन या दैनिकाला लाभत असे. अल्पावधीतच हा नवा पक्ष एकदम यशस्वी झाला आणि ‘वंदे मातरम्’ हे वृत्तपत्र भारतभर वितरित होऊ लागले. (क्रमश:)

Latest posts by अभीप्सा मराठी मासिक (see all)
अभीप्सा मराठी मासिक

या संकेतस्थळावरील बहुतांश सर्व मजकूर हा श्रीअरविंद व श्रीमाताजी लिखित आहे, त्याचा मराठी अनुवाद अभीप्सा मासिकाने केला आहे. तसेच या मासिकातर्फेच, आकलनाच्या सोयीसाठी काही ठिकाणी चित्रे, तक्ते, आकृत्या यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Recent Posts

मुलांचे संगोपन

(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…

20 hours ago

विजयाची खात्री

जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…

2 days ago

सकारात्मक वृत्तीचा परिणाम

  (लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…

3 days ago

स्वप्नांवर विश्वास ठेवा

उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…

4 days ago

उपयुक्ततावादाचा आजार

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…

5 days ago

शिक्षण आणि संस्कृती

व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…

6 days ago