‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
अरविंद घोष – ०८
इंग्लंडमध्ये असतानाच अरविंद घोष यांनी त्यांचे आयुष्य देशसेवेसाठी आणि त्याच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी वाहून घेण्याचे ठरविले होते. भारतात आल्याबरोबर, राष्ट्राला भविष्याबद्दलच्या कल्पनांविषयी जागृत करावे या हेतूने केलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, त्यांनी लगेचच दैनिकामधून राजकीय विषयांवर निनावी पद्धतीने लिखाण करायला सुरुवात केली.
भारतात आल्यानंतर अरविंदांनी तत्कालीन राजकारणाचा धांडोळा घेतला पण, त्यांना तत्कालीन काँग्रेसची मवाळ भूमिका मानवली नाही. काही काळातच त्यांनी मुंबई येथून प्रकाशित होणाऱ्या ‘इंदुप्रकाश’ या वृत्तपत्रामध्ये ‘New lamps for old’ ही लेखमाला चालविली. त्या लेखमालेमधून ते काँग्रेसच्या मवाळ धोरणाविषयी टीका करत होते. त्यामध्ये तत्कालीन काँग्रेस पक्षाच्या विनंती, अर्जविनवण्या आणि विरोध या धोरणावर कडाडून टिका करण्यात आली होती आणि स्वयंसहाय्यतेवर आणि निर्भयतेवर आधारित कृतिशील नेतृत्वाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. कोणत्याही भारतीयाने आजवर इतक्या उत्तम इंग्रजीमध्ये, इतके ओजस्वी लिखाण तोपर्यंत केलेले नव्हते त्यामुळे जेव्हा हे लिखाण प्रकाशित होऊ लागले तेव्हा सर्वांचेच लक्ष त्याकडे वेधले गेले. विशेषतः इंग्रज सरकारचे…
याच पार्श्वभूमीवर तत्कालीन समाजधुरिण न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी तत्कालीन संपादक श्री. के. जी. देशपांडे यांच्या मार्फत असे जहाल लिखाण लिहू नये, असा निरोप अरविंदाना पाठविला. तसे लिखाण प्रसिद्ध केल्यास लेखकाला अटक होण्याची शक्यता आहे अशी आशंका न्या. रानडे यांनी व्यक्त केली. तेव्हा आपल्याला जो आशय ज्या पद्धतीने मांडायचा आहे, तसा तो मांडता येणार नाही, अशी शक्यता लक्षात आल्यावर, अरविंदांनी ती लेखमाला बंद केली आणि राजकारणाच्या तत्त्वज्ञानाविषयी लिखाण करावयास सुरुवात केली. (क्रमश: …)
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…