‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
अरविंद घोष – ०७
बडोद्यामध्ये आल्यानंतरही अरविंद घोषांवर काही काळ पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव टिकून होता. मुंबई व कलकत्त्याहून मागविलेल्या पेट्यांमधील पुस्तके ते वाचत असत. अरविंदांना बंगाली शिकविणारे शिक्षक सांगतात, “अरविंद त्यांच्या टेबलाजवळ बसून तेलाच्या दिव्याच्या प्रकाशात, डासांचे असह्य दंश रात्रभर सोसत, अगदी सकाळ होईपर्यंत वाचत बसत असत. ध्यानावस्थेत मग्न असलेल्या योग्याला जसे आजूबाजूच्या घटनांचे काही भान नसते त्याप्रमाणे, पुस्तकावर डोळे खिळलेल्या अशा स्थितीत तास न् तास बसून त्यांचे वाचन चालत असे. आगीने घर वेढले गेले असते तरीही त्यांची एकाग्रता भंग पावली नसती.”
इंग्रजी, रशियन, जर्मन, फ्रेंच भाषेतील कादंबऱ्या ते वाचत असत. त्याचबरोबर ते भारतातील धर्मग्रंथांचे, उपनिषद, भगवद्गीता, रामायण, महाभारत या ग्रंथांचे वाचन करत असत.
अरविंदांच्या निकटवर्तीयांपैकी एकाने सांगितलेली अजून एक आठवण –
मी अरविंद घोषांची अजून एक गोष्ट पाहिली ती म्हणजे, त्यांना पैशाबद्दल आसक्ती नव्हती. त्यांना एका पिशवीमध्ये तीन महिन्यांचा पगार एकत्रितपणे मिळत असे, तो पगार टेबलावर असलेल्या एका ट्रे मध्ये ते रिकामा करत असत. पैसे कडीकुलुपामध्ये, तिजोरीमध्ये बंदिस्त करून ठेवणे त्यांना मानवत नसे. होणाऱ्या खर्चाचा ते कधीही हिशोब मांडत नसत. एकदा असेच मी सहज त्यांना विचारले की “तुम्ही पैसे असे का ठेवता?” ते हसले आणि म्हणाले, “आपण चांगल्या आणि प्रामाणिक लोकांमध्ये राहत आहोत याची ही खूणच नाही का?’ त्यावर मी त्यांना विचारले, “पण तुमच्या भोवतीच्या या लोकांचा प्रामाणिकपणा पारखण्यासाठी तरी तुम्ही त्या पैशाचा हिशोब कुठे ठेवता?” तेव्हा गंभीर चेहऱ्याने ते म्हणाले, “तो ईश्वरच माझा जमाखर्च सांभाळतो. मला जेवढे आवश्यक आहे तेवढे तो मला देतो आणि उरलेले स्वत:कडेच ठेवतो. तो मला काही कमी पडू देत नाही, मग मी कशाला काळजी करू?” (क्रमश: …)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…