‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
३० एप्रिल १९०१ रोजी अरविंद घोष यांचा विवाह श्री. भूपालचंद्र बोस यांच्या कन्येशी, मृणालिनीदेवी यांच्याशी झाला. परदेशगमन करून आलेल्या अरविंदांचे, तत्कालीन प्रथेनुसार शुद्धीकरण करण्याचा प्रसंग समोर उभा ठाकला, प्रागतिक विचारसरणीच्या अरविंदांनी त्याला साफ नकार दिला. कलकत्ता येथे संपन्न झालेल्या या विवाहप्रसंगी सर जगदीशचंद्र बोस सपत्निक उपस्थित होते. अरविंद घोष तेव्हा २९ वर्षांचे होते.
अरविंद हे बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांच्या सचिवालयात कार्यरत होते. कोणते एखादे महत्त्वाचे पत्र, आदेश, खलिता, किंवा ब्रिटिश शासनाशी पत्रव्यवहार किंवा त्यासंबंधी कागदपत्रे असतील तर अरविंदांना बरेचदा बोलावणे धाडण्यात येत असे. काही भाषणे तयार करून देण्यासाठी सुद्धा ते महाराजांना मदत करत असत.
कालांतराने अरविंदांनी सर्व तऱ्हेच्या सार्वजनिक कार्यक्रमांमधून स्वत:ला बाजूला केले आणि ते गुप्तपणाने राजकीय कार्यात इ. स. १९०५ पर्यंत कार्यरत राहिले. परंतु क्रांतिकारक पक्षाचा संभाव्य नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहता येईल अशा टिळकांशी त्यांनी संपर्क साधला आणि अहमदाबाद काँग्रेस परिषदेमध्ये (इ. स. १९०२) ते लोकमान्य टिळकांना भेटले. टिळकांनी त्यांना मंडपाच्या बाहेर नेले आणि तेथील मैदानावरच त्यांनी, महाराष्ट्रामध्ये त्यांना अभिप्रेत असलेली कार्यपद्धती कोणती त्याविषयी अरविंदांशी एक तासभर चर्चा केली. असे करत असताना, सुधारणावादी वा उदारमतवादी चळवळीविषयीचा तिरस्कारही टिळकांच्या शब्दांमधून अभिव्यक्त होत राहिला. (क्रमश: …)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…