व्यक्तीला जर ‘प्रकृती’शी संवाद साधता आला, तर व्यक्ती जीवनातील थोडीफार रहस्ये शिकू शकते, ती रहस्ये तिला खूप उपयोगी ठरू शकतात. व्यक्तीला त्यामुळे केवळ आजारपणाची पूर्वसूचनाच मिळते असे नाही तर, व्यक्ती त्यावर नियंत्रणसुद्धा मिळवू शकते, किंवा येणारी आपत्ती टाळू शकते आणि ‘प्रकृती’चा विनाश टाळू शकते. अशा प्रकारे, त्याचे अनेक फायदे आहेत. संवाद साधायचा म्हणजे काय? तर सर्व अस्तित्वाला व्यापून असणाऱ्या ‘सुसंवादाच्या आनंदा’तील ज्ञान शोधून काढणे आणि त्याच्या चेतनेने स्पंदित होणे. ही गोष्ट खरोखरच शोध घेण्यायोग्य आहे. हे आयुष्यभर करण्याचे कार्य आहे. या चेतनेचा शोध घ्या आणि या सूक्ष्म जगताशी सुसंवाद साधण्याचा आनंद प्राप्त करून घ्या. व्यक्ती शांततेमध्येच सुसंवाद साधू शकते आणि एक प्रकारच्या सूक्ष्म देवाणघेवाणीने स्वतःला अभिव्यक्त करते. ती अगदी पूर्णतया स्वतंत्र अशी भाषा आहे की जी शब्दांमध्ये व्यक्त करता येणे शक्य नाही, कारण आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण शब्दांचा वापर करत असतो. तर ती स्वतंत्र भाषा म्हणजे एक लघु आणि अचूक अभिव्यक्ती असते आणि आपल्या भाषेपेक्षा ती कितीतरी अधिक प्रमाणात आकलन होण्यायोग्य असते.
– श्रीमाताजी
(Throb of Nature : 04)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…