मला असा एक माणूस माहीत आहे की, ज्याला त्याची चेतना व्यापक करायची होती; तो म्हणाला की, त्याला त्यासाठीचा मार्ग सापडला आहे. रात्रीच्या वेळी उघड्यावर जमिनीवर पाठ टेकून आडवे पडायचे आणि चांदण्यांकडे पाहत राहायचे, त्यांच्याशी तादात्म्य पावायचा प्रयत्न करायचा आणि त्या जगड्व्याळ अशा विश्वात खोलखोल दूरवर जायचे. अशा रीतीने ही पृथ्वी, तिच्यावरील छोट्या छोट्या गोष्टी, त्यांची व्यवस्था, त्यांचे प्रमाण या सगळ्या गोष्टींबाबतचे भान हरपून जाते आणि तुम्ही आकाशाएवढे विशाल होता – पण तुम्ही ब्रह्मांडाएवढे विशाल होता असे म्हणू शकत नाही कारण आपण जे पाहतो तो त्याचा (ब्रह्मांडाचा) केवळ अंशभागच असतो, परंतु तुम्ही चांदण्यांनी भरलेल्या आकाशाएवढे विशाल होता, असे म्हणू शकता. आणि अशा रीतीने, काही कालावधीसाठी तरी तुमच्यातील छोट्या छोट्या अशुद्धता गळून पडतात आणि व्यक्ती एका अतिविशाल मापदंडाद्वारे गोष्टी समजावून घेते. हा खरोखर चांगला प्रयोग आहे.
– श्रीमाताजी
(CWM 05 : 151)
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…