सद्भावना – ११
प्रत्येक व्यक्ती तिच्याभोवती स्पंदनांनी बनलेले असे एक वातावरण वागवत असते; ही स्पंदने त्या व्यक्तीच्या चारित्र्यातून, तिच्या विचारसरणीतून, तिच्या मनःस्थितीतून, तिच्या भावनांच्या, तिच्या कृती करण्याच्या पद्धतीतून निर्माण होत असतात. प्रत्येकाचे असणारे असे हे वातावरण, संपर्काच्या द्वारे, परस्परांवर क्रिया-प्रतिक्रिया करत असते; ही स्पंदने संसर्गजन्य असतात; म्हणजे असे की, आपण ज्या व्यक्तीला भेटतो त्या व्यक्तीची स्पंदने आपण अगदी सहजगत्या स्वीकारतो, विशेषतः त्या व्यक्तीची स्पंदने शक्तिशाली असतील तर! यावरून एक गोष्ट सहज लक्षात येईल की, एखादी व्यक्ती स्वतःमध्ये आणि स्वतःभोवती शांती आणि सद्भावना वागवीत असेल तर, ती व्यक्ती तिच्या व्यक्तिमत्त्वातील आंशिक का होईना पण शांती आणि सद्भावना यांचे एक प्रकारे प्रक्षेपणच इतरांवर करेल, आणि त्याऐवजी ती व्यक्ती जर तिरस्कार, चिडचिड आणि रागराग या गोष्टी वागवत असेल तर, (तिच्या संपर्कात आलेल्या) इतर व्यक्तींमध्ये देखील तशाच प्रवृत्ती जागृत होतील. याच्या आधारे अनेक घटनांचे स्पष्टीकरण देता येणे शक्य आहे, अर्थात, हे काही एकमेव स्पष्टीकरण नाही.
– श्रीमाताजी
(CWM 16 : 32)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…