सद्भावना – १०
मी अनेकदा लोकांना असे बोलताना ऐकले आहे की, “काय हे? मी आता चांगले वागायचा प्रयत्न करतो आहे आणि प्रत्येकजण माझ्याशी वाईटच वागतोय.” पण हे असे घडते ते तुम्हालाच शिकवण देण्यासाठी असते की, व्यक्तीने कोणतातरी अंतःस्थ हेतू बाळगून चांगले असता कामा नये, म्हणजे असे की, इतरांनी तुमच्याशी चांगले वागावे म्हणून तुम्ही चांगले वागायचे, असे नाही तर, व्यक्तीने चांगले असण्यासाठीच चांगले वागले पाहिजे.
नेहमीसाठी तोच धडा आहे : जितके काही चांगले, जितके उत्तम करता येईल तेवढे करावे, परंतु फळाची अपेक्षा बाळगू नये, परिणाम दिसावेत म्हणून काही करू नये. अगदी ह्या दृष्टिकोनामुळेच, म्हणजे चांगल्या कृतीसाठी, सत्कार्यासाठी काहीतरी बक्षिसाची अपेक्षा बाळगायची, जीवन सुखकर होईल असे वाटते म्हणून चांगले वागायचे, या अशा गोष्टींमुळेच सत्कार्याची किंमत नाहीशी होऊन जाते.
चांगुलपणाच्या प्रेमापोटीच तुम्ही चांगले असले पाहिजेत, न्यायाच्या प्रेमापोटी तुम्ही न्यायी असले पाहिजेत; तुम्ही पावित्र्याच्या, शुद्धतेच्या प्रेमापोटीच पवित्र व शुद्ध असावयास हवे आणि निरपेक्षतेच्या प्रेमापोटीच निरपेक्ष असायला हवे, तरच तुम्ही मार्गावर प्रगत होण्याची खात्री बाळगू शकता.
– श्रीमाताजी
(CWM 03 : 264-265)
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…