विचार शलाका – १५
एकदा का तुम्ही योगमार्गामध्ये प्रवेश केलात की, तुम्ही सर्व प्रकारच्या भीतीपासून स्वतःची सुटका करून घेतली पाहिजे. मनामधील, प्राणामधील, शरीरामधील भीती, ही भीती तर शरीराच्या पेशीपेशींमध्ये भिनलेली असते; या सर्व प्रकारच्या भीतीपासून सुटका करून घेतली पाहिजे. तुम्हाला योगमार्गावर जे धक्के खावे लागतात त्याचा एक उपयोग म्हणजे या भीतीपासून तुमची सुटका करणे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या या भीतीच्या कारणांपासून मुक्त, निर्लिप्त, अस्पर्शित आणि शुद्ध असे त्यांच्यासमोर उभे ठाकू शकत नाही तोपर्यंत ही भीतीची कारणे तुमच्यावर पुन्हापुन्हा हल्ला करतच राहतात. एखाद्याला समुद्राची भीती वाटते तर दुसऱ्या एखाद्याला आगीची भीती वाटते. दुसऱ्याला कदाचित असे आढळेल की, त्याला वारंवार वणव्यापाठीमागून वणव्याला सामोरे जावे लागत आहे. त्याच्या शरीरातील एकूण एक पेशीचे भीतीने थरकापणे बंद होण्याइतपत जोवर तो प्रशिक्षित होत नाही, तोपर्यंत हे चालूच राहते. ज्याला तुम्ही घाबरत असता, ती भीती जोवर जात नाही तोवर ती गोष्ट पुन्हा पुन्हा तुमच्यापाशी येत राहते. जो रूपांतरण करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि जो या मार्गाचे अनुसरण करणारा आहे त्याने पूर्णतः निर्भय बनले पाहिजे. त्याच्या प्रकृतीच्या कोणत्याही भागामध्ये भीतीचा लवलेशदेखील राहता कामा नये.
– श्रीमाताजी
(CWM 03 : 57)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…