साधनेची मुळाक्षरे – ०७
आपण का जगतो हे जाणून घेणे म्हणजे ‘ईश्वरा’चा शोध घेणे आणि ‘त्याच्या’शी जागृत ऐक्य पावणे; केवळ याच साक्षात्कारावर लक्ष एकाग्र करण्याची अभीप्सा बाळगणे; सर्व प्रकारच्या परिस्थितीचे रूपांतरण ध्येयप्राप्तीपर्यंत पोहोचण्याच्या साधनांमध्ये कसे करायचे हे जाणून घेणे.
*
प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा एका नवीन आणि पूर्णतर अशा आत्मनिवेदनाचे निमित्त झाला पाहिजे. आणि ते आत्म-निवेदन, कार्याबद्दलच्या भ्रांतकल्पनांनी भरलेले, अतिरिक्त सक्रिय, उथळ, उत्तेजित अशा आत्म-निवेदनांपैकीचे एक असता कामा नये, तर ते सखोल, शांत असे आत्म-निवेदन असले पाहिजे, ते दृश्य स्वरूपात असलेच पाहिजे असे काही आवश्यक नाही परंतु ते आत खोलवर जाऊन पोहोचेल आणि तेथून साऱ्या कृतींचे परिवर्तन घडवून आणेल, असे असले पाहिजे.
– श्रीमाताजी
(CWM 16 : 428), (CWM 01 : 80)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…