साधनेची मुळाक्षरे – ०६
प्रश्न : पण ईश्वराला या गोंधळामध्ये, या पृथ्वीवर आविष्कृत व्हायची इच्छा का असते?
श्रीमाताजी : पृथ्वी म्हणजे त्या ईश्वराचेच विरूप (deformation) आहे आणि ‘तो’ त्याचे सत्य पुन्हा एकदा या पृथ्वीवर प्रस्थापित करू इच्छितो. त्याचसाठी त्याने ही पृथ्वी निर्माण केली आहे ; त्यामागे अन्य कोणताही हेतू नाही. पृथ्वी ही ‘त्याच्या’पासून विलग झालेली गोष्ट नाही किंवा ‘त्याला’ परकी नाही. पृथ्वी म्हणजे ‘ईश्वरा’चे विरूपीकरण आहे; ही पृथ्वी तिच्या साररूपात जशी होती तशीच, म्हणजे ‘ईश्वरस्वरूप’ बनण्याची पुन्हा एकदा आवश्यकता आहे.
प्रश्न : पण मग तो ‘ईश्वर’ आपल्यासाठी इतका अनोळखी का आहे?
श्रीमाताजी : बाळा, तो काही अनोळखी नाही. तो अनोळखी आहे, अशी तुम्ही कल्पना करता पण तो तसा नाही, तो अजिबात तसा नाही. तो तुमच्या अस्तित्वाचे सार आहे – तो काही अनोळखी नाही. तुम्ही ‘त्याला’ ओळखत नसलात तरीही तो अनोळखी नाही; तो तुमच्या अस्तित्वाचे अगदी मूळ सार-सर्वस्व आहे. ‘ईश्वरा’खेरीज तुम्ही अस्तित्वातच राहू शकणार नाही. ईश्वराखेरीज सेकंदाच्या एक दशलक्षाव्या भागाइतका काळदेखील तुम्ही जिवंत राहू शकणार नाही. याचे कारणच असे आहे की तुम्ही एक प्रकारच्या भ्रमामध्ये व विरूपामध्ये जगत असता, तुम्हाला त्याची जाणीव नसते. तुम्ही स्वतःच्या मूळ स्वरूपाविषयी सजग नसता, तर तुम्ही जे आहात, असे तुम्हाला वाटत असते, त्याच्याविषयीच फक्त तुम्हाला जाणीव असते; पण वस्तुतः तुम्ही ते नसता.
प्रश्न : माताजी, मग मी स्वतः कोण आहे?
श्रीमाताजी : ईश्वर!
– श्रीमाताजी
(CWM 07 : 191-192)
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…