मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०१
व्यक्ती मृत्युच्या भीतीवर कशी मात करू शकते? तर, यासाठी अनेक पद्धती उपयोगात आणता येऊ शकतात. परंतु, या आपल्या प्रयत्नांमध्ये साहाय्यभूत होतील अशा काही मूलभूत संकल्पना प्रथम लक्षात घेऊ. जाणून घेतली पाहिजे अशी सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की, जीवन हे एकसलग आहे आणि अमर्त्य आहे; फक्त त्याची रूपे अगणित, क्षणभंगुर आणि नाशिवंत असतात – हे ज्ञान व्यक्तीने मनामध्ये सुरक्षितपणे आणि कायमस्वरूपी स्थापित केले पाहिजे आणि या प्रत्येक रूपापासून स्वतंत्र असणाऱ्या पण तरीही या सर्व रूपांमधून आविष्कृत होणाऱ्या शाश्वत जीवनाशी, व्यक्तीने स्वतःची चेतना शक्य तितकी तादात्म्य केली पाहिजे. समस्या तशीच शिल्लक असते; पण या तादात्म्यामुळे समस्येला सामोरे जाण्यासाठी अपरिहार्य असा मनोवैज्ञानिक आधार प्राप्त होतो. अगदी आंतरिक अस्तित्व जरी सर्व भीतीच्या पलीकडे जाण्याइतपत प्रदीप्त झालेले असले तरीही शरीराच्या पेशींमध्ये भीती दडून राहिलेली असते; ती धूसर, स्वाभाविक, तर्कातीत आणि बरेचदा ती अगदी अज्ञात असते. व्यक्तीने या अंधार भरल्या गहनतेमध्ये तिचा शोध घेतला पाहिजे, तिचा ताबा घेतला पाहिजे आणि तिच्यावर ज्ञानाचा आणि दृढ विश्वासाचा प्रकाश टाकला पाहिजे.
– श्रीमाताजी
(CWM 12 : 82-83)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…