मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०१
व्यक्ती मृत्युच्या भीतीवर कशी मात करू शकते? तर, यासाठी अनेक पद्धती उपयोगात आणता येऊ शकतात. परंतु, या आपल्या प्रयत्नांमध्ये साहाय्यभूत होतील अशा काही मूलभूत संकल्पना प्रथम लक्षात घेऊ. जाणून घेतली पाहिजे अशी सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की, जीवन हे एकसलग आहे आणि अमर्त्य आहे; फक्त त्याची रूपे अगणित, क्षणभंगुर आणि नाशिवंत असतात – हे ज्ञान व्यक्तीने मनामध्ये सुरक्षितपणे आणि कायमस्वरूपी स्थापित केले पाहिजे आणि या प्रत्येक रूपापासून स्वतंत्र असणाऱ्या पण तरीही या सर्व रूपांमधून आविष्कृत होणाऱ्या शाश्वत जीवनाशी, व्यक्तीने स्वतःची चेतना शक्य तितकी तादात्म्य केली पाहिजे. समस्या तशीच शिल्लक असते; पण या तादात्म्यामुळे समस्येला सामोरे जाण्यासाठी अपरिहार्य असा मनोवैज्ञानिक आधार प्राप्त होतो. अगदी आंतरिक अस्तित्व जरी सर्व भीतीच्या पलीकडे जाण्याइतपत प्रदीप्त झालेले असले तरीही शरीराच्या पेशींमध्ये भीती दडून राहिलेली असते; ती धूसर, स्वाभाविक, तर्कातीत आणि बरेचदा ती अगदी अज्ञात असते. व्यक्तीने या अंधार भरल्या गहनतेमध्ये तिचा शोध घेतला पाहिजे, तिचा ताबा घेतला पाहिजे आणि तिच्यावर ज्ञानाचा आणि दृढ विश्वासाचा प्रकाश टाकला पाहिजे.
– श्रीमाताजी
(CWM 12 : 82-83)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…