समर्पण – ४२
…आयुष्यात निदान एकदा तरी, आपल्याबाबतीत अशी परिस्थिती येते की जेव्हा ईश्वरी इच्छेप्रत संपूर्ण समर्पण करण्यासाठी आपण तयार आहोत की नाही, याची परीक्षा होते; आपण ईश्वरत्वाच्या प्राप्तीसाठी आणि त्याच्या आविष्करणासाठी धडपणारे मानव आहोत का याची परीक्षा होते; परमोच्च विजयासाठी जगातील यच्चयावत सर्व गोष्टींचा म्हणजे ज्या आपल्याला खराब वाटतात किंवा ज्या आपल्याला चांगल्या वाटतात अशाही सर्व गोष्टींचा, परित्याग करण्याची तुमची तयारी आहे की नाही याची परीक्षा घेण्यासाठी आयुष्यात अशी परिस्थिती येत असते. आपल्या बाह्य दुर्बलता आणि दोष यांच्यापेक्षा आपले गुण आणि आपली कर्तव्यं – म्हणजे असे म्हणता येईल की, आपले मानसिक पूर्वग्रह आणि अग्रक्रम, हे शिखरावर जाण्याच्या या आरोहणामध्ये, मार्गावर वाट अडवून उभे राहतात. एखादी त्रुटी ही नेहमीच उड्डाणफळी म्हणून वापरता येते पण गुण मात्र बरेचदा एक मर्यादा बनून, एक अडथळा बनून समोर उभे ठाकतात, त्यांना ओलांडूनच पुढे जावे लागते.
– श्रीमाताजी
(CWM 14 : 113)
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…