मानसिक परिपूर्णत्व – १५
आत्मप्रकाशाशी आणि ईश्वरी हाकेशी एकनिष्ठ राहण्यासंबंधी मी जे बोलत होतो त्यामध्ये, मी तुमच्या गतायुष्यातील कोणत्या गोष्टीविषयी किंवा तुमच्यामधील एखाद्या उणिवेविषयी बोलत नव्हतो. तर सर्व संघर्षामध्ये, हल्ल्यांमध्ये आवश्यक असणाऱ्या एका गोष्टीकडे निर्देश करत होतो – सत्यप्रकाशाला, सत्याच्या हाकेला विरोध करणाऱ्या कोणत्याही सूचना, आवेग, प्रलोभन यांचे म्हणणे ऐकण्यास नकार देण्याच्या आवश्यकतेकडे, मी निर्देश करत होतो. सर्व शंकाकुशंका आणि निराशेच्या वेळी असे म्हणावे की, ”मी ईश्वराचा आहे, मी अपयशी होऊ शकणार नाही.” अशुद्धतेच्या आणि अपात्रतेच्या सर्व सूचनांना उत्तरादाखल म्हणावे की, ”मी ईश्वराने निवडलेले अमर्त्यतेचे बालक आहे. मी फक्त माझ्याशी आणि ईश्वराशी प्रामाणिक असावयास हवे, तर विजय निश्चित आहे; अगदी मी जरी पडलो, धडपडलो तरी मी खात्रीने पुन्हा उभा राहीन.” कोणतेतरी कनिष्ठ ध्येय पूर्ण करण्यासाठी, या उच्च्तर ध्येयापासून दूर जाऊ पाहणाऱ्या सर्व आवेगांना उत्तर द्यावे की, “हे सर्वात महान असे ध्येय आहे. माझ्या अंतरंगात वसणाऱ्या आत्म्याचे समाधान करू शकेल असे हे एकमेव सत्य आहे; या दिव्यत्वाच्या प्रवासामध्ये कितीही परीक्षा आणि संकटांना सामोरे जावे लागले, तरी मी धीराने ध्येयापर्यंत पोहोचेनच.” ‘प्रकाशाशी आणि हाकेशी एकनिष्ठता’ याचा मला अभिप्रेत असणारा अर्थ हा होता.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 99)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…